शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

हुकूमशाहीच्या अहंकाराविरुद्ध शिवशाहीची क्रांतीची मशाल धगधगणार!

By अजित मांडके | Updated: February 19, 2024 20:11 IST

शिवजयंतीला राजन विचारांचे महाराजांना पत्र

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिवजयंतीच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात विचारेंनी महाराष्ट्राची सद्यस्थितीचे उल्लेख करताना, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना नावाच्या स्वराज्य आणि पक्ष चिन्ह असलेले ' धनुष्यबाण ' स्वतःच्या स्वार्थासाठी कसे तोडले याबद्दल नमूद केले आहे. तसेच आता हुकूमशाहीच्या अहंकारविरुद्ध शिवशाहीची क्रांतीची मशाल धगधगणार असे म्हटले आहे. हुकूमशाही विरुद्ध लढाईत शिवशाही विजयी होणार, तो विजय आमच्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा असणार आहे. या व्हायरल झालेल्या त्या पत्राच्या साडेपाच मिनिटांच्या व्हिडिओने पुन्हा विचारेंनी भावनिक आणि मार्मिक मुद्दे मांडून योग्य पध्द्तीने भाजप- शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

या व्हिडीओच्या सुरवातीला त्यांनी महाराजानां मुजरा करत, महाराज तुमची आठवण येते असे म्हटले आहे. शिवजयंती म्हणजे शिव भक्तांसाठी दिवाळी आहे. तसेच महाराज आपण रायलेश्वरासमोर स्वराज्याची शपथ घेतली होती. तशीच शपथ आपल्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांनी घेत, शिवसेना नावाचे स्वराज घेऊन आमच्या रक्षणासाठी उभे राहिले. मात्र त्यांच्या ५८ वर्षांचे धनुष्यबाण काही मंडळींनी स्वतःच्या शुल्लक स्वार्थासाठी तोडू टाकल्याची खंत व्यक्त केली. महाराज आपण म्हटले होते राजा कोणी ही असो पण रयत महत्वाची आहे. पण आज धर्म आणि जातीच्या नावावर त्या रयतेच्या मनात एकमेकांविषयी विष पसरवले जात आहे. पण ज्यांना हे कळते ते तुमच्या नावाने हिंदुत्वाचा गैरवापर करत आहेत. चाकू, सुऱ्या,कोयते आणि बंदूक घेऊन गुंड रस्त्यावर फिरताना दिसत आहे. आता सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होतात, विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते, ही सत्ता रयतेच्या मनात दहशत निर्माण करीत आहे. असे म्हटले आहे.  ज्या स्वराज्यात बळीराजाला आपण मानाचे स्थान दिले होते, त्यालाच आज स्वतःच्या हक्कासाठी सरकार विरुद्ध लढावे लागत आहे. महाराज तुमचाच गनिमी कावा यांनी स्वराज्य फोडण्यासाठी केला.

आता शब्दांनाही लाज वाटावी, एवढे यांचे चारित्र्य मल्लीन झाले आहे. यांना माफी नाही महाराज, हे राज्य उलटून टाकण्याची वेळ आली आहे. आणि आज मी एकटा नाही महाराज, बाळासाहेबांचे विचार घेऊन उद्धव ठाकरे त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने आम्ही सर्व मावळे उतरलोय, आम्ही लढणार. सत्ता नाही इनाम महत्त्वाचा आहे,असे आपणच म्हटले होते. या हुकूमशाही विरुद्ध शिवशाहीची ही लढाई सच्चाई ची लढाई आहे. सत्याचा विजय होणार, रयतेच्या मनात जी ज्योत पेटवली आहे, ती आता वनवा होणार, क्रांतीची मशाल धगधगणार, हुकूमशाही विरुद्ध लढाईत शिवशाही विजयी होणार , तो विजय आमच्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा असणार आहे. असेही विचारेंनी त्या पत्रात म्हटले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज