शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मुख्यमंत्र्यांनी रोखले रस्ता रुंदीकरण!

By admin | Published: January 09, 2016 2:10 AM

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून

कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून घेतल्याने थांबवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा सुरु असून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ही कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.स्मार्ट सिटी प्रकल्पात कल्याण रेल्वे स्थानक परिसराच्या रुंदीकरणाला व विकासाला आयुक्त ई रवींद्रन यांनी विशेष प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराकडे जाणारा शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यास शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ झाला. कडक पोलीस बंदोबस्त याकरिता तैनात केला होता. कारण या कारवाईला व्यापाऱ्यांनी सक्त विरोध केला होता. व्यापाऱ्यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता धावून आले होते व त्यांनी अशी कारवाई होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र अचानक दुपारनंतर पोलीस बंदोबस्त काढून घेतला गेला व कारवाई थांबली. कारवाई थांबली असली तरी ८० टक्के पाडकाम झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला तर व्यापाऱ्यांनी स्वत:हून काही बांधकाम पाडण्याची तयारी दाखवल्याने कारवाई थांबली, असा दावा व्यापाऱ्यांनी केला.इमारती, दुकाने अशा ३१२ जणांना त्यांचे बांधकाम पाडून टाकण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यात मोठया प्रमाणावर व्यापाऱ्यांची बांधकामे होती. त्यांनी हे रूंदीकरण थांबावे म्हणून सर्वप्रकारे प्रयत्न करून पाहिले. कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दोन दिवस दुकाने बंद ठेवली आणि निषेध प्रकट केला. त्याचवेळी मंत्री मेहता हे व्यापाऱ्यांना भेट द्यायला आले. स्मार्ट सिटी लोकांकरिता आहे की, अधिकाऱ्यांकरिता असा सवाल मेहता यांनी करीत. कारवाई होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता.आयुक्त रवींद्रन हे कारवाईवर ठाम होते. त्यांनी दबावाला बळी न पडता शुक्रवारी सकाळपासूनच ४ जेसीबी, ३ पोकलेन, २०० पोलीस कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी, आठ प्रभागक्षेत्र अधिकारी असा मोठा फौजफाटा कारवाईसाठी तैनात केला होता. व्यापाऱ्यांनी हस्तक्षेप करु नये याकरिता शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही कारवाई होणारच हे स्पष्ट झाल्याने काही व्यापाऱ्यांनी गुरूवारी रात्रीपासूनच आपली वाढीव बांधकामे स्वत:हून पाडण्यास सुरूवात केली होती. आम्हाला रुंद रस्ते हवे अशी भूमिका पादचारी व वाहन चालक यांनी घेत आयुक्तांच्या या कारवाईचे कौतुक केले. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास कारवाई थांबविण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयातून आयुक्त रवींद्रन यांना दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा आहे. नगरविकास व गृह ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांच्या कार्यालयाखेरीज हे घडले नाही, असे बोलले जाते. प्रकाश मेहता यांनी कल्याणमधील कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने ती थांबली, असेही बोलले जाते.