शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

जिल्हा परिषदेच्या आवारात रानभाज्या महाेत्सवात ठाणेकर!

By सुरेश लोखंडे | Updated: August 25, 2023 18:25 IST

रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी या रानभाज्या महोत्सवाचे आयाेजन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंणेकडून करण्यात आले

ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या आवारात रानभाज्या महोत्सव उत्साहात पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करत या महोत्सवाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यास शुक्रवारी ठाणेकर गृहिणींनी उत्तम प्रतिसाद दिला.

रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी या रानभाज्या महोत्सवाचे आयाेजन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंणेकडून करण्यात आले. महोत्सवात भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील ४० स्टॉल लावण्यात आले. या स्टाॅलवर पावसाळ्यातील औषधी व गुणकारी रानभाज्या उपलब्ध असून आघाडा, शेवळा, कुलूची भाजी, भारंग, मायाळू, कपाळफोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा इतर सर्व रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या हाेत्या.उद्घाटनानंतर जिंदल यांनी उमेदच्या महिलांना शुभेच्छा यावेळी दिल्या. ते म्हणाले की निसर्गाने आपल्याला जे दिलंय ते तुम्ही शहरी भागातील लोकांना देताय हे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात तरुण लोकांमध्ये हार्ट ॲटॅकचे प्रमाण वाढत आहे. सर्वांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे कारण रोजच्या जेवणातील पोषण घटक कमी होत आहेत. जीवनशैली बदलत चाललेली आहे. त्यामुळे प्रतिज्ञा करायला हवी की आठवड्यातून एक दिवस रानभाज्या खायला हव्यात.

आरोग्य सुधारण्यासाठी रानभाज्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपला उपक्रम महत्त्वाचं आहे, असेही जिंदल यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमात उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, यांनी मानवाच्या रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी रानभाज्या पुर्ण वर्षभरात केवळ पावसाळ्याच्या १-२ महिन्यात उपलब्ध होत असल्याचे सांिगतले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छाया शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) प्रमोद काळे, महिला बालकल्याण विभाग प्रमुख संजय बागुल आदी अधिकार्यांस ठाणेकर या महाेत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते