शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

कूपनलिकांवर रांगाच रांगा, नळपाणीयोजनेत भ्रष्टाचार, नेत्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:58 IST

राज्य सरकारच्या विविध योजनांतून शहापूर तालुक्यात मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी आजही अनेक योजना अपूर्णच असून अनेक विहिरींचा व नळपाणीपुरवठा योजनांचा घोळ जैसे थे आहे.

शेणवा : राज्य सरकारच्या विविध योजनांतून शहापूर तालुक्यात मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी आजही अनेक योजना अपूर्णच असून अनेक विहिरींचा व नळपाणीपुरवठा योजनांचा घोळ जैसे थे आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या डोळखांब आदिवासी ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तळवाडा ग्रामपंचायत हद्दीत असणाºया रोडवहाल या आदिवासी गावात टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ६०० च्या आसपास लोकसंख्या असून ९८ घरांची वस्ती असणाºया या गावात पाणीच मिळत नाही. एक महिन्यापूर्वी पाण्यासाठी साली पिल्लू झुगरे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. परंतु, लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्षच देत नसल्याने हे भयानक प्रकरण उजेडात आले नाही.

२००४ मध्ये या ठिकाणी पाणीयोजना मंजूर झाली होती. एक कोटीची असणारी ही योजना एकच दिवस पाणी देऊन कायमची बंद झाली. या ठिकाणी दोन कूपनलिका आहेत. एक खाजगी मालकीची आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गावासाठी दिली आहे. परंतु, सध्या या ठिकाणची भूजल पातळी इतकी खालावली आहे की, एक तास हपासल्यानंतर या कूपनलिकेला पाणी सुरू होते. पहाटे ३ वाजता महिलांना पाण्यासाठी नंबर लावावा लागतो. पहाटे गेलेली महिला सकाळी ८ वाजता दोन हंडे पाण्याचे घेऊन येते. तेवढेच पाणी संपूर्ण दिवस पिण्यासाठी वापरतात.

अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी पाच किलोमीटरवर असणाºया डोळखांब येथील चोर नदीवर जावे लागते. दोन वर्षांपासून या ठिकाणी टँकरच आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कूपनलिका आहेत तरीही त्यासाठी दोन हंडे पाण्यासाठी पाच तास रांग लावावी लागते. चार महिला कूपनलिका हपसायला लागतात. तर, अजून १० दिवसांनी आम्हाला सात किलोमीटरवर पाणी आणण्यासाठी जावे लागणार असल्याचे ज्योती खाकर यांनी सांगितले.

पेंढरघोळ येथील विहिरीला मिळाला जलस्रोतगेल्या वर्षी लवकर गेलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याचे स्रोत शोधणे, हे मोठे आव्हान आहे. तरीही, सध्या पेंढरघोळ येथे बांधण्यात येणाऱ्या विहिरीला अनेक जलस्रोत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर विषयाबाबत ‘लोकमत’ने ‘दुष्काळदाह’च्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्याची गंभीर दखल लघुपाटबंधारे विभागाने घेतली आहे.

पाऊस गेल्याने पाण्याची पातळी खालावली आणि तालुक्यातील विहिरीदेखील आटल्या. यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली. पेंढरघोळ येथे निर्माण झालेली ही पाणीसमस्या कायमची सुटावी, म्हणून गेल्या वर्षी मंजूर झालेल्या जलकुंभाचे काम दोन दिवसांपूर्वीच लघुपाटबंधारे विभागाकडून हाती घेण्यात आले. दिवसरात्र हे खोदकाम सुरू असून ३० फुटांवरच पाण्याचे अनेक झरे लागल्याने नागरिकांसह अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आजच्या कडक उन्हातही लागलेले हे झरे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देतील, असे जाणकार सांगतात. ३३ फूट खोल आणि साडेतेरा मीटर रुंदीचा हा जलकुंभ १७ लाख रुपये खर्चून बांधण्यात येत आहेत. या जलकुंभाच्या पाण्यामुळे येथे असलेल्या आश्रमशाळेबरोबरच इतर दोन पाड्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या जलकुंभाचे खोदकाम सुरू असतानाच पाण्याचे झरे लागल्याने आम्ही नक्कीच समाधानी आहोत. हे पाणी गावपाडे यांना टंचाईच्या काळात नक्कीच उपयोगी ठरेल असे लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी.आर. तडवी यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईshahapurशहापूर