शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

रिक्षाप्रवास दोन रूपये स्वस्त

By admin | Published: October 07, 2016 5:14 AM

कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूरमध्ये चार सीएनजी पंप सुरु झाले आहेत. आणखी काही पंप प्रस्तावित आहेत. त्याचा फायदा २० हजारांहून अधिक रिक्षांना झाला

अनिकेत घमंडी / डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूरमध्ये चार सीएनजी पंप सुरु झाले आहेत. आणखी काही पंप प्रस्तावित आहेत. त्याचा फायदा २० हजारांहून अधिक रिक्षांना झाला आहे. त्यामुळे या रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय कल्याण आरटीओने घेतला आहे. तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळताच ३५ लाख प्रवाशांचा रोजचा प्रवास स्वस्त होईल.हकीम समितीच्या निकषांचा आधार घेत हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. ठाणे शहरात ज्या प्रमाणे पहिल्या टप्प्यासाठी १८ रुपये भाडे आकारले जाते, त्याच पद्धतीने या शहरातही आकारले जाईल. सध्या या शहरांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी २० रुपये भाडे आकारण्यात येते. भाड्याचे नवे सूत्रपेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांना इंधन स्वस्त पडते. अनकेदा इंधनांच्या वाढीमुळे भाडे वाढवले जाते. आता सीएनजी सुविधेमुळे भाडेही कमी करावे आणि सीएनजीच्या खर्चानुसार भाड्याची नवी रचना ठरवावी, असे आरटीओचे म्हणणे आहे.एमएमआरटीए घेणार निर्णयच्कल्याण आरटीओअंतर्गत येणाऱ्या या सर्व शहरांत २० हजार रिक्षा आहेत. त्यातील सुमारे १८ हजार रिक्षा सीएनजीवर चालतात. तर ५०० रिक्षा एलपीजीवर चालतात. हकीम समितीच्या निकषांनुसार ६० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त रिक्षा सीएनजीवर चालत असतील, तर सीएनजीच्या दराच्या सूत्रानुसार भाडे आकारावे लागते. त्याची अंमलबजावणी ठाण्यात होते. च्ती कल्याण आरटीओअंतर्गत येणाऱ्या डोंबिवली-कल्याण, टिटवाळा ते बदलापूरपर्यंतच्या सर्व शहरांमध्येही होण्याची गरज आहे. तशी ती व्हावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे आरटीओने सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. च्याबाबत निर्णय घेण्यासाठी ५ आॅक्टोबरला एमएमआरटीएची बैठक होणार होती. तांत्रिक कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली असून पुढील बैठकीत हा निर्णय होईल.शेअर भाड्यातही कपातच्शेअर पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या रिक्षाचालकांनाही सध्याच्या भाड्यात कपात करावी लागेल. ते भाडेही साधारण दोन रूपयांनी कमी होईल. शेअर रिक्षांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा निश्चितच फायदा होईल. च्डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी शेअर पद्धतीने जाण्यासाठी किमान १० रुपये, तर अन्य ठिकाणी १२ रूपयांपासून २० रूपये आकारले जातात. मात्र या शेअर भाड्यावर कुणाचाही अंकूश नाही. पुन्हा मीटरसक्ती 1या सर्व शहरांमध्ये सुमारे ७५ रिक्षा स्टँड असून डोंबिवलीत २८, तेवढेच कल्याणमध्ये, बदलापूर ६, अंबरनाथ ६ अशा प्रमाणात अधिकृत स्टँड आहेत.2ठाण्याप्रमाणेच रिक्षा चालकांना शिस्त लागावी, यासाठी या शहरांमध्येही मीटरची सक्ती करण्यात येणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठीही संबंधित यंत्रणांना सांगण्यात आले आहे. मीटरसक्ती झाल्यास त्याचा फायदा नागरिकांना हाईल. अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यावर मर्यादा येईल.