शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

भरती, बढती नियम लालफितीत

By admin | Published: September 23, 2016 3:17 AM

ठाणे महापालिकेने २०१० मध्ये ठराव करून कर्मचारी, अधिकाऱ्यांची भरती, बढतीसंदर्भातील नियमावली २०११ मध्ये शासनाच्या मंजुरीसाठी पाठवली होती

ठाणे : ठाणे महापालिकेने २०१० मध्ये ठराव करून कर्मचारी, अधिकाऱ्यांची भरती, बढतीसंदर्भातील नियमावली २०११ मध्ये शासनाच्या मंजुरीसाठी पाठवली होती. परंतु, तिला अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पालिकेत अद्यापही २०८५ पदे भरलेली नाहीत. यामुळे पालिकेतील अनेक सहायक आयुक्त, उपायुक्तांसह इतर अधिकाऱ्यांच्या खांद्यावर चार ते पाच विभागांचा अतिरिक्त कार्यभार पडला आहे. यामुळे नागरिकांच्या कामांनादेखील त्यांना पुरेसा वेळ देता येत नसल्याचेही दिसून येत आहे. याचसंदर्भात ठाण्यातील दक्ष नागरिकाने न्यायालयात धाव घेतली असून त्याच्या सुनावणीत महापालिकेला चार आठवड्यांत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे महापालिकेने २०१० मध्ये ठराव क्रमांक १७३ अन्वये मंजूर केलेली कर्मचारी, अधिकारी यांची भरती, बढती नियमावली २०११ मध्ये शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली होती. परंतु, तिला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आता माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान, पालिकेने स्थापित केलेल्या विभागीय बढती समितीने काही पदे थेट भरतीने, तर काही बढतीने भरली. ही पदे थेट भरताना अथवा बढतीने भरताना काही प्रशासकीय कर्मचारी व तांत्रिक विभागातील अधिकारी, अभियंत्यांना प्रारूप भरती, बढतीचे निकष शिथिल करून बदली देण्यात आली. त्यामुळे जे कर्मचारी, अधिकारी सहायक आयुक्त, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख बढतीपासून अनेक वर्षे वंचित राहिले आहेत. दरम्यान, काही अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक पदांचा पदभार सोपवण्यात आला आहे. शासनाच्या २७ डिसेंबर २०११ च्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी अतिरिक्त पदाचा पदभार सुरू ठेवायचा असेल, तर अशा प्रकरणी दोन वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी शासनाची पूर्वानुमती घेणे आवश्यक आहे. तसेच पूर्वानुमती न घेता अतिरिक्त कार्यभाराची व्यवस्था दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी चालू ठेवण्यास कार्योत्तर मंजुरीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच वरील तरतुदींचे पालन न करता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ अतिरिक्त पदाचा कार्यभार चालू ठेवणाऱ्या व त्यासाठी विशेष वेतन मंजूर करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे या शासन निर्णयात नमूद केले आहे.