शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

बदलापूर गाड्यांचे थांबे कमी करा

By admin | Published: August 13, 2016 3:57 AM

मुंबईहून बदलापूर-कर्जतला येणाऱ्या गाड्यांना ठाणे-डोंबिवलीत थांबा देऊ नये, प्रवाशांची वाढलेली संख्या विचारात घेऊन त्या प्रमाणात बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवावी,

बदलापूर : मुंबईहून बदलापूर-कर्जतला येणाऱ्या गाड्यांना ठाणे-डोंबिवलीत थांबा देऊ नये, प्रवाशांची वाढलेली संख्या विचारात घेऊन त्या प्रमाणात बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवावी, गर्दीच्या वेळी दोन गाड्यांमधील अंतर कमी करावे, बदलापूरहून सुटणाऱ्या गाड्यांत उल्हासनगर आणि अंबरनाथहून बसून येणाऱ्या प्रवाशांना रोखावे, गाड्यांना कोणत्याही कारणाने विलंब होत असेल, तर त्याची माहिती लागलीच उद्घोषणेच्या माध्यमातून द्यावी... या वरवर साध्या वाटणाऱ्या पण प्रवाशांचा अंत पाहणाऱ्या मागण्या शुक्रवारी डीआरएमसमोर मांडण्यात आल्या.मेगाब्लॉकच्या दिवशी तांत्रिक कामांसोबत रेल्वे गाड्यांचीही दुरुस्ती करावी, सकाळी ८.११ ची लोकल फलाट क्रमांक-३ ऐवजी क्रमांक-१ वर आणावी, कमी सीट असलेल्या लोकल बदलापूर-कर्जतसारख्या लांबच्या प्रवासासाठी सोडू नयेत, बदलापूर स्थानकात शेड उभारावी, कर्जत दिशेकडे पादचारी पूल उभारावा, गर्दीच्या वेळेत लोकलला आडव्या येणाऱ्या एक्स्प्रेस आणि मालगाड्यांना मार्ग देऊ नये, हे मुद्देही मांडण्यात आले. या तासाभराच्या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांचा प्रतिसाद थंड-पुरेसा नसल्याने प्रवाशांचे प्रतिनिधी आक्रमक झाले. त्यामुळे डीआरएम अमिताभ ओझा यांनी सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी १९ आॅगस्टला बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच या बैठकीला केवळ प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींना न बोलवता प्रवाशांच्या प्रतिनिधींनाही संधी देण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले.आंदोलन करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिनिधींपैकी अश्विनी सावंत, सविता दूधवडकर, शिल्पा पाटकर, जयश्री शिंदे, रिगल गजबी, प्रज्ञा गायकवाड यांच्यासह अनेक तरुणांनी या चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)