शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

फेरीवाला समितीची होणार पुनर्रचना

By admin | Published: August 30, 2016 2:32 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ मध्ये शहरातील ३० सदस्यांची फेरीवाला समिती स्थापन केली होती.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ मध्ये शहरातील ३० सदस्यांची फेरीवाला समिती स्थापन केली होती. मात्र, त्याच्या मंजुरीला नकार देत राज्य सरकारने ३ आॅगस्टला जाहीर केलेल्या धोरणानुसार २० जणांचीच समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे फेरीवाला समितीची पुनर्रचना होणार आहे. त्यात आता ३० ऐवजी २० जणांची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेरीवाल्यांना रोजगार व्यवसायांतर्गत मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र एकता हॉकर्स या फेरीवाला कृती समितीने सर्वोच्च न्यायालयात २००२ मध्ये याचिका दाखल केली. त्यावर, २०१३ मध्ये झालेल्या अंतिम सुनावणीतील आदेशानुसार न्यायालयाने केंद्र सरकारला राष्ट्रीय फेरीवाला विधेयकावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, केंद्र सरकारने २०१४ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला विधेयकाला मान्यता दिली. याप्रमाणे केंद्राने सर्व राज्यांना फेरीवाला धोरण स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे धोरण तयार करण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू असतानाच मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील पाच हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. ३० जणांची समितीही स्थापन केली. मात्र, त्यांना कोणतेही अधिकार दिले नाहीत. दरम्यान, महापालिकेने फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईविरोधात स्थानिक फेरीवाला संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने फेरीवाल्यांचे पुरावे तपासून त्यांना पर्यायी जागा द्याव्यात. तत्पूर्वी, त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना महापालिकेला केली. तसेच राज्य सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे प्रशासनाने फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी २४ आॅगस्ट २०१५ ला मे. सार आयटी रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीची नियुक्ती केली. या नियुक्तीला मान्यता मिळावी, यासाठी त्याचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी यांच्याकडे पाठवला. त्यावर, संचालनालयाने प्रस्ताव अमान्य करत राज्य सरकारच्या फेरीवाला धोरणानंतरच कार्यवाही करण्याची सूचना महापालिकेला केली. अखेर, ३ आॅगस्टला राज्य सरकारने फेरीवाला धोरण जाहीर केले. त्यामुळे महापालिकेला फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यात ३० जणांची फेरीवाला समिती २० वर आणण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे पूर्वीची समिती बरखास्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील सदस्य मात्र प्रशासनाच्या लगीनघाईवर नाराज झाले आहेत. (प्रतिनिधी)