शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

रिलायन्स जिओवर ठामपाची ‘असीम’ भक्ती!, २१६ कोटींचे नुकसान, १५०० रुपयांचा दर केला फक्त ७२ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 1:44 AM

महापालिकेने अधिका-यांच्या कृपेने रिलायन्स जिओ कंपनीवर दाखवलेली गुप्त अशी ‘असीम’ भक्ती ही तब्बल २१६ कोटी रुपयांची असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सिद्ध झाले आहे.

ठाणे : महापालिकेने अधिका-यांच्या कृपेने रिलायन्स जिओ कंपनीवर दाखवलेली गुप्त अशी ‘असीम’ भक्ती ही तब्बल २१६ कोटी रुपयांची असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सिद्ध झाले आहे. केबल टाकण्यासाठी रिलायन्सकडून प्रतिचौरस मीटरला ७२ रुपये नव्हे, तर नियमानुसार १५०० रुपये खोदाई शुल्क वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने महापालिकेच्या तिजोरीत रस्तेखोदाईपोटी सुमारे २३१ कोटी रुपये जमा झाले आहेत. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी प्रतिचौरस मीटरला हा दर १५०० रुपयांवरून अवघा ७२ रुपये केला होता. मात्र, राष्ट्रवादीने त्याविरोधात याचिकेद्वारे धाव घेतल्याने न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले होते. त्यामुळे पालिकेचे होणारे २१६ कोटी रुपयांचे नुकसान वाचले आहे. यामुळे दर कमी करून रिलायन्सवर मेहरबानी दाखवणाºया तत्कालीन सर्व संबंधित अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

ठाणे, कळवा, घोडबंदर परिसरातील सुमारे ९५ किमी लांबीचे रस्ते खोदून त्याखाली एफओसी केबल टाकण्यात येणार होत्या. यापैकी ७४.५३ किमी अंतराचे रस्ते जुन्या पद्धतीने खोदण्यात येणार होते. २०.७७ किमी अंतराच्या रस्त्यांवर मायक्रोे ट्रेचिंग पद्धतीने म्हणजेच बारीक चर मारून वाहिन्या टाकण्यात आल्या. महापालिकेने यापूर्वी अंतर्गत वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदण्याच्या परवानगीचा दर प्रतिचौरस मीटर क्षेत्रफळासाठी १५०० रु पये इतका निश्चित केला आहे. मात्र, रस्त्यांवर बारीक चर मारून वाहिन्या टाकण्याची यंत्रणा अत्याधुनिक असून या मायक्र ो ट्रेचिंगचे दर सवलतीचे असावेत, असा निर्णय घेऊन तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी मुंबई महापालिकेने रिलायन्सला अशा पद्धतीने चर खोदण्यासाठी ७२ रुपये प्रतिचौरस मीटर जो दर आकारला होता, तोच ठाण्यातही आकारावा, असे ठरवले. त्यानुसार, सरसकट १५.५२ कोटींची आकारणी ठाणे महापालिकेने केली होती. परंतु, राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची अ‍ॅण्टीकरप्शनमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रस्तावामुळे महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला होता. त्यानंतर, आयुक्तपदी नियुक्त झालेल्या संजय जयस्वाल यांनी त्या निर्णयास स्थगिती देऊन रस्तेखोदाईनुसार दर आकारण्यात यावेत, असे आदेशही दिले होते. त्यानुसार, सुमारे २६ कोटी भरण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.

त्यानुसार, सुमारे २६ कोटी भरण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. मात्र, या प्रकरणाची चौकशी न झाल्याने माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी रिलायन्सकडून १४० कोटी रु पये वसूल करावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर संबंधितांकडून नियमानुसार वसुली करावी, असे आदेश दिल्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने उशिरा का होईना संबंधितांकडून त्यानुसार वसुलीला सुरुवात केली. त्यानुसार, आतापर्यंत १५ कोटी नाही, तर तब्बल २३१ कोटींची वसुली रस्तेखोदाईच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेकडून केली असल्याची लेखी माहिती पालिकेने काँग्रेसच्या एका नगरसेवकाला दिली आहे.नौपाडा प्रभाग समिती : १३ कोटी ८४ लाख ७४ हजार १४२ रुपयेमुंब्रा, दिवा - २६ कोटी ३६ लाख ५६ हजार ६९४ रुपयेवर्तकनगर - १५,०९,४५,५७०लोकमान्य - सावरकरनगर- ९,६१,९८,११०वागळे - २८,९२,६१,४३१उथळसर - १६,९८,७३,०१२कळवा - ३३,७७,४१,००५मुख्यालय- टप्पा १ - ३२,७९,६५,६१६टप्पा २ - ४२,१९,१६,०७८एकूण - २३१,७०,४३,५७१ कोटीयाच पद्धतीची वसुली पालिकेने इतर कंपन्यांच्या बाबतही करणे अपेक्षित होते. परंतु, तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे या प्रकरणाबरोबरच इतर प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी येत्या विधानसभेत केली जाईल, अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

टॅग्स :Jioजिओ