शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
2
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
3
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
4
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
5
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
6
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
7
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
8
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
9
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
10
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
11
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
12
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
13
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
14
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
15
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
16
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
17
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
18
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
19
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
20
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!

नोकरीसाठी दुबईत जाऊन शोषण होत असलेल्या तरुणीची सुटका

By धीरज परब | Published: June 07, 2024 6:51 PM

. या प्रकरणी पोलिसांच्या भाईंदर भरोसा सेलने परराष्ट्र मंत्रालय व दुबईतील हॉटेल  मालका सोबत चर्चा करून तिला परत भारतात सुखरूप आणले आहे . 

मीरारोड - एजंटच्या मार्फत दुबईत हॉटेल मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली म्हणून गेलेल्या भाईंदरच्या २९ वर्षीय तरुणीचे शोषण करून पगार दिला  जात नव्हता . या प्रकरणी पोलिसांच्या भाईंदर भरोसा सेलने परराष्ट्र मंत्रालय व दुबईतील हॉटेल  मालका सोबत चर्चा करून तिला परत भारतात सुखरूप आणले आहे . 

भाईंदर पश्चिम भागात राहणाऱ्या एका महिलेने ३ जून रोजी भाईंदरच्या भरोसा सेल येथे तक्रार अर्ज केला होता . तिची २९ वर्षीय मुलीला दिल्लीतील तरुण ( वय वर्षे ४० ) ह्या एजंटने दुबई येथील एका नामांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट चे काम असुन महिना ७० हजार  रूपये पगार असल्याचे सांगितले होते.  ८ एप्रिल रोजी ती दुबई येथे पोहचल्यावर एजंट तरूण याने तिचा पासपोर्ट व व्हिजा काढून घेतला. तिला ४० ते ५० महिला राहत असलेल्या एका हॉलमध्ये ठेवले.  अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात होते . जबरदस्तीने अधिक तास काम करवून घेतले जात होते . त्यातच तिला अस्थमा असल्याने तिची तब्बेत खराब होत चालली.   तिने एजंट तरूण यास सांगितले असता, ६ महिने काम करावेच लागेल असे सांगितले. 

हॉटेल मालक सलीम ह्याने पगार हा एजंटला दिला सांगितले . एजंटने तिचा दोन महिन्याचा पगार स्वतःच घेतला . पोलिसांच्या भाईंदर येथील भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांच्या कडे तक्रार आल्यावर शिंदे यांच्या सह भारती देशमुख, आफ्रिन जुन्नैदी, पूजा हांडे, अक्षय हासे, विजय घाडगे यांच्या पथकाने तरुणीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले . शिंदे यांना ह्या आधी देखील परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरखरूप आणण्याचा अनुभव होता . 

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे  व सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तेजश्री शिंदे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  "मदद" या पोर्टलवर तरुणीची माहिती दिली .  तरुणीशी संपर्क करून तिची हकीकत जाऊन घेत तिला धीर दिला . हॉटेल मालकाचा क्रमांक घेऊन शिंदे यांनी त्याच्याशी संपर्क साधला . तिची तब्येत बरी नसून उपचाराची आवश्यकता असल्याने तात्काळ भारतात परत पाठवण्याबाबत चर्चा केली . अखेर मालक सलीम ह्याने तरुणीला परत पाठवण्याची तयारी दर्शवली आणि ती ६ जून रोजी मायदेशी सुखरूप परतली . 

परदेशात कामाचे चांगले पैसे मिळतील या आमिषाने भारतातून कामानिमित्त अनेक मुलींना परदेशात एजंटच्या मार्फतीने पाठवले जाते.  परंतु परदेशातील कायदे व प्रक्रिया माहित नसल्याने अनेक कामगार परदेशामध्ये अडकून पडतात. त्यामुळे नागरिकांनी अशा एजंटपासून सावधान रहा व कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असे आवाहन मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे . 

 

टॅग्स :mira roadमीरा रोड