शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 4:08 AM

दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.

राजू काळे भाईंदर : दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती व त्यांनतर महाराष्ट्रात सुद्धा निवासी संकुलामध्ये फटाके विक्रीला न्यायालयाने बंदी घातली होती. तरीही लक्ष्मी पूजनाच्या व पाडव्याच्या आतषबाजीनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे. या महानगरांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीपर्यंत घसरली आहे. दिल्लीमध्ये गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग झाले होते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फरडाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बनडाय आॅक्साईड आणि नायट्रेस गॅसेस बाहेर पडतात. त्याचा सर्वाधिक त्रास अस्थमाच्या रुग्णांना होतो. लहान मुले, वृद्ध यांना श्वसनाचे आजार होतात.दिवाळीच्या दिवसांत व त्यानंतर दोन दिवसांत श्वसनाच्या विकारांचे ३० ते ४० टक्के नवे रूग्ण येतात. ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनचा त्रास नव्हता. लहान मुलांची फुफुसे छोटी असल्याने त्यांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. चेकर यांनी सांगितले की, फटाक्यांमधील विषारी घटक असतात. ती धूराच्या स्वरुपात हवेत बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाच्या व अस्थमाच्या पेशंटमध्ये वाढ होते.मुंबई व ठाणे या शहरांचा विचार करता काळाच्या ओघात येथील चाळ संस्कृती नष्ट होऊन उंचच उंच टॉवर संस्कृती उदयास आली आहे. या उंच इमारतींमध्ये राहणाºयांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. कारण फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे विषारी घटक जमिनीपासून ५०० ते हजार फुटावर तरंगत राहतात. त्यामुळे टॉवरमधील ज्येष्ठ तसेच लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतो.>मालाडमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषणकेंद्र सरकारच्या ‘सफर’ या वायू प्रदूषण मोजणाºया संस्थेच्या या वर्षीच्या अहवालानुसार मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांचे प्रदूषण कमालीचे वाढले असून प्रदूषित वायूंची तसेच ‘पर्टिक्युलेट मॅटर’ म्हणजेच घनरूप दूषित कणांची उपस्थिती धोक्याच्या पातळीवर दाखवली आहे. सफरच्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड भागात शहरातील सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. या उपनगरातील हवेचा दर्जा केवळ खालवलाच नसून घातक पातळीपर्यंत पोहोचला आहे. आधीच वायूप्रदूषण अधिक असलेल्या मुंबईत दिवाळीच्या दिवसांत अस्थमा रूग्णांना राहणे मुश्कील होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक