शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

येऊरमध्ये पर्यटकांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:26 AM

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धबधबे आणि पर्यटन स्थळांवर बंदी असतानादेखील अनेक पर्यटक लपूनछपून शहराला लागून असलेल्या येऊर येथील धबधबे ...

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धबधबे आणि पर्यटन स्थळांवर बंदी असतानादेखील अनेक पर्यटक लपूनछपून शहराला लागून असलेल्या येऊर येथील धबधबे आणि तलावामध्ये जाऊन पोहण्याचा व पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यास जात आहे. अशा अतिउत्साहीपणामुळे येथील तलावात बुडून पाचजणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या घटनांनंतर वन विभाग आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे आता येऊर पर्यटनस्थळी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला असून, तसेच फलकदेखील जागोजागी लावले आहेत.

ठाणे शहरात निसर्गाने नटलेल्या संजय गांधी येऊर या पर्यटन स्थळी पावसाळ्याच्या काळात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसह अतिउत्साही पर्यटकांचादेखील वावर वाढत असल्याचे दिसून येते. अशाच अतिउत्साही पर्यटकांच्या वावराला आवर घालण्यासाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये तीन वर्षांची शिक्षा आणि २५ हजारांच्या दंडाची तरतूद आहे, अशा आशयाचे फलक वनविभागाने येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात लावून, तसेच पहारा देऊन पर्यटकांना प्रवेशबंदी केली. पावसाळ्याच्या काळात अनेक हौशी पर्यटक रविवार सुट्टीचा दिवस निसर्गाच्या व धबधब्यांच्या सान्निध्यात घालविण्यासाठी व पार्ट्यांचे फड रंगविण्यासाठी येऊरचा रस्ता धरत असतात. यामुळे एक तर जंगल परिसरातील शांतत भंग होत असते, तर दुसरीकडे पर्यटकांकडून फेकण्यात येणाऱ्या जेवणाच्या डिश, पाण्याच्या बाटल्या फेकण्यात येत असल्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत असते. त्यात जंगलातील तलावात पोहण्याचा आनंददेखील लुटण्यासाठी जात असतात. असेच मागील दहा ते १५ दिवसांपूर्वी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर वन विभाग आणि पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. याची गांभीर्याने दाखल घेऊन जंगलातील निषिद्ध क्षेत्रात वनविभागाने फलक लावले असून, खडा पहाराही देण्यात येत आहे. त्यामुळे येऊरच्या जंगलात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटकांचा वावर

वन्यजिवांचा वावर असलेल्या अरण्यात पर्यटकांना प्रतिबंध असतानाही सुरक्षेच्या अभाव असल्याने सध्या रोज हजारो पर्यटक जंगलात फिरत आहेत. याकडे वनविभाग, पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या भागात वनविभागाने, तसेच पोलिसांनी गस्त घालावी आणि प्रतिबंधित क्षेत्रात जागोजागी फलक लावण्याची मागणी येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ येऊर संवर्धन व विकास समिती, तसेच संडे ट्रेकर्स संस्थेच्या वतीने ॲड. संतोष आग्रे यांनी केली आहे.