शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

न्यायप्रविष्ट काळूधरण सध्या तरी शक्य नाही

By admin | Published: March 07, 2016 2:18 AM

काळू धरणासाठी कोणत्याही प्रकारच्या मान्यता नसताही ते बांधायला निघालेल्या पाटबंधारे विभागाची सध्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडूनझाडाझडती सुरू आहे.

सुरेश लोखंडे ,ठाणेकाळू धरणासाठी कोणत्याही प्रकारच्या मान्यता नसताही ते बांधायला निघालेल्या पाटबंधारे विभागाची सध्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडूनझाडाझडती सुरू आहे. त्या आधी बनावट डिझाईन व नकाशाद्वारे बांधकाम हाती घेतलेल्या या धरणाच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयीन पातळीवर कोणत्याही हालचाली नसताना न्यायप्रविष्ट धरण बांधण्याच्या वल्गना करून जलसंपदा मंत्री व पालकमंत्री ठाणेकरांची दिशाभूल करीत असल्याचे या धरणाविरोधातील सक्रीय संघटनांकडून सांगितले जात आहे.संभाव्य काळू धरण दोन हजार १९९ हेक्टरवर शेतजमिनीसह वन जमिनीवर बांधले जाणार आहे. पण अद्याप महसूल विभागाकडून या जमिनीचे संपादनही केलेले नाही, धरणाचे मूळ डिझाईन, स्ट्रक्चरला डिझाईन आदी नाशिकच्या सरकारी इंस्टिट्युटचे कोणतेही नकाशे नसतानाही त्यचे काम एफ. ए. कन्स्ट्रक्शनस्् कंपनीने सुरू केले होते. एमएमआरडीएच्या मालकीच्या या धरणावर सुमारे दीड ते दोन वर्षात ११२ कोटी खर्च झालेले आहे. त्यातून सुमारे २० टक्के काम झाल्याचे सांगितले जात असतानाच पाटबंधारे विभागाच्या काही अभियंत्यासह ठेकेदार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चक्रव्युहात सापडले आहेत. या धरणाचे काम सुरू करण्याचे सांगून न्यायालयीन आदेशाचा अवमान जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री एकनाथ शिंदे करीत असल्याची जाणकारांमध्ये चर्चा आहे. जिव्हाळ्याच्या पाणीटंचाईवर नागरिकांची मनधरणी करण्यासाठी अन्य मार्ग असताना अन हा विषय न्यायप्रविष्ट असतानाही काळू धरण बांधण्याची वाच्यता या जबाबदार मंत्र्यांनी करणे योग्य नसल्याचे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे. मुळात या धरणासाठी भूसंपादान झालेले नाही. वन विभागाची मान्यता नाही, आठ ग्रामपंचायतींचे बोगस ठराव असल्याचे न्यायालयाने आधीच उघड केले आहे. नवीन कायद्यानुसार या धरणामुळे होणारे ‘सामाजिक परिणाम ’ अहवाल अद्यापही तयार नाहीत. नष्ट होणाऱ्या वनसंपदेबाबत वन खात्याची सहमती नाही. असे असतानाही धरणाचे काम कसे सुरू होणार, धरण बांधण्याच्या या केवळ भूलथापा असल्याचे या काळू धरणा विरोधात जनहित याचिका दाखल करून स्थगिती मिळवणाऱ्या श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी लोकमतला सांगितले.