शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
3
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
4
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
5
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
6
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
7
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
8
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
9
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
10
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
11
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
12
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
13
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
14
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
15
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
16
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
17
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
18
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
19
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
20
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

बदलापूर गावाकडे जाणारा रस्ता बनला अपघातप्रवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:26 AM

बदलापूर : बदलापूरच्या उल्हास नदीकडून बदलापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर अपघात वाढले आहेत. यापूर्वी हा रस्ता अरुंद ...

बदलापूर : बदलापूरच्या उल्हास नदीकडून बदलापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर अपघात वाढले आहेत. यापूर्वी हा रस्ता अरुंद असल्याने येथून वाहने कमी वेगाने जात असत. काही महिन्यांपूर्वी हा रस्ता रुंद करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचा वेगावर ताबा राहिलेला नाही. या रस्त्यावर धोकादायक वळण असल्याने अपघातांत आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वळणाच्या ठिकाणी गतिरोधक लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

बदलापूर, म्हसा, मूळगाव तसेच मुरबाडला जाण्यासाठी अनेक नागरिकांना हा मार्ग सोयीचा ठरतो. या रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्यानंतर या रस्त्यावर वाहनांची वर्दळ पहायला मिळत आहे. मात्र, याच रस्त्यावरील धोकादायक वळणावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याने आता स्थानिकांकडून या वळणावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर आणि रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीही अपघात घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच या वळणावर एक चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून येथे गतिरोधक टाकावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

------