शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

उल्हासनगरात भर पावसात रस्त्याची दुरुस्ती, केंद्रीय मंत्री येण्यापूर्वी रस्ते उजळले

By सदानंद नाईक | Published: September 12, 2022 9:02 PM

महापालिकेवर होत आहे टीका.

उल्हासनगर : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्यानिमित्त पावसात श्रीराम चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने, महापालिकेवर टीका होत आहे. गणेशोत्सव दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र पाऊस सुरू झाल्याने काम बंद केले असून श्रीराम चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत साळुंके यांनी दिली.

उल्हासनगरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली असून गणेशोत्सव दरम्यान रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम महापालिका बांधकाम विभागाने सुरू केले. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने, विभागाने रस्ते दुरुस्तीचे काम बंद केले. श्रीराम चौकातील रस्त्याच्या एका भागात खड्डेच खड्डे झाल्याने, त्या भागाचे डांबरीकरण सोमवारी केले. पाऊस थांबल्यावरच रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे संकेत यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश साळुंखे यांनी दिली. मात्र भर पावसात श्रीराम चौकात रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने, रस्त्याच्या दुरुस्ती बाबत नागरिकांनी प्रश्नचिन्हे उभे केले.

महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी व दुरुस्तीसाठी ७ कोटीच्या निधीची तरतूद केली होती. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे महापालिका बांधकाम विभागाने न भरल्याने पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाली. पाऊस थांबल्यास गणेशोत्सव पूर्वी रस्ते चकाचक करण्याचे आश्वासन आयुक्त अजीज शेख यांनी नागरिकांना दिले होते. मात्र पावसाने विश्रांती घेतली नसल्याने, रस्ता दुरुस्तीचे काम राहून गेले. मंगळवारी केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर शहरात येणार असल्याने, श्रीराम चौकातील रस्त्याचे पावसात डांबरीकरण झाल्याचा आरोप नागरिकांसह राजकीय पक्षनेते व दुकानदार करीत आहेत. मात्र यामध्ये तथ्य नसून हे काम नियमित असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता साळुंके यांनी दिली

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरulhasnagarउल्हासनगर