शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मीरा-भाईंदर मधील रस्त्यांची झाली चाळण ; गणपती बाप्पाचे आगमन खड्डयांमधूनच   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 8:08 PM

या वर्षी देखील पावसाळा सुरु होताच शहरातील बहुतांश लहान - मोठे रस्ते खड्ड्यात गेले आहेत .  त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असुन वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत .

मीरारोड -  मीरा भाईंदर मधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून गणरायाचे आगमन देखील भाविकांना खड्डेमय रस्त्यांवरून करावे लागले . शहरातील मुख्य रस्त्यां पासून गल्लीबोळातील रस्ते देखील खड्ड्यात गेले असून गेल्या वर्षी खड्डयां मुळे बळी जाऊन देखील महापालिका आणि नगरसेवक यांचे दुर्लक्ष कायम आहे . 

या वर्षी देखील पावसाळा सुरु होताच शहरातील बहुतांश लहान - मोठे रस्ते खड्ड्यात गेले आहेत .  त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असुन वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत . दुचाकी स्वरांना तर खड्डे चुकवत वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे . पालिकेने काही ठिकाणी खड्ड्यात भरलेली खडी सुद्धा निघाली असून ती रस्त्यावर पसरल्याने आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांना वाहनाच्या चाकाखाली दगड उडून मार बसण्याची भीती वाटते . 

खड्डयांमुळे काही चालक व प्रवाश्याना पाठ , कंबर दुखीचा त्रास  देखील होत असल्याच्या तक्रारी आहेत . मुळात पालिका रस्ता बनवताना तो निकृष्ट बनवते आणि त्याचा समतोस साधला जात नाही म्हणून रस्त्यात पाणी साचुन दरवर्षी रस्ते खराब होतात . मग त्याच रस्त्यांच्या पॅचवर्क साठी कोट्यवधी रुपयांचे ठेके दिले जातात . 

गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये  काशिगावा जवळ छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील एका खड्डय़ा मुळे बोरीवलीच्या दत्तापाडा मार्गावर राहणारे हेमंत कांबळे (33) यांचा मृत्यु झाला होता. खड्डय़ा मुळे एकटीव्हा वरुन खाली पडलेल्या कांबळे यांच्या अंगावर मागुन आलेला गॅस सिंलेंडरचा ट्रक चढला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेने महापालिकेवर संतापाची झोड उठली होती .  यंदा देखील खड्डयां मुळे आणखी कोणाचा बळी जाण्याची वाट पालिका पहात आहे का ? असा संताप लोकं व्यक्त करत आहेत . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे