शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

दुर्गाडी नव्या पुलाची मार्गिका आजपासून प्रवाशांना खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:28 AM

कल्याण : भिवंडी - कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहा पदरी पुलापैकी दोन लेनचे काम पूर्ण ...

कल्याण : भिवंडी - कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहा पदरी पुलापैकी दोन लेनचे काम पूर्ण झाले आहे. या दोन लेनचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते सोमवारी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. दरम्यान, या लोकार्पणाआधीच शिवसेना, भाजप आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे.

या नव्या पुलामुळे दुर्गाडी पुलावरील वाहतूककोंडी आता संपुष्टात येणार आहे. दरम्यान, पुलाचे काम मार्गी लागल्यावरून राजकीय पक्षांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. शिवसेनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना, तर भाजपने याचे श्रेय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मनसेनेही माजी आमदार प्रकाश भोईर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच पुलाच्या दोन लेन प्रवाशांसाठी खुल्या होत असल्याचे म्हटले आहे. पत्रकबाजी आणि सोशल मीडियावरून सुरू असलेले श्रेयाचे राजकारण चर्चेचा विषय ठरले आहे. प्रकाश भोईर यांनी १५ जुलै २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन कल्याण खाडीवर समांतर पूल बनवण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच पुलाच्या लेनचे उद्घाटन शक्य झाल्याची पोस्ट मनसेचे सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. दुर्गाडी नवीन पुलाला साबीर भाई शेख सेतू असे नाव द्यावे. कोनगाव आणि कल्याण ही दोन्ही शहरे त्यांची कर्मभूमी आणि मातृभूमी होती, हे विसरू नये, याकडेही शेख यांनी लक्ष वेधले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच काम मार्गी लागल्याचे म्हटले आहे. भाजपच्या निवेदनात म्हटले आहे की, खासदार कपिल पाटील यांनी हाती घेतलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये नव्या दुर्गाडी पुलाचाही समावेश होता. दुर्गाडी येथे आणखी सहा पदरी नव्या पुलासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. अरूंद दुर्गाडी पुलामुळे वाहतूककोंडीचा फटका फडणवीस यांनाही बसला होता. त्यामुळे त्यांनी दुर्गाडी पुलाच्या कामाला महत्त्वाचे स्थान दिले होते. कंत्राटदाराने काम रखडविल्यानंतर तातडीने नवा कंत्राटदार नेमण्यासाठीही त्यांनी मान्यता दिली होती. याकडे खासदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

-

फोटो