शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

रेतीबंदर प्रभाग बकाल

By admin | Published: June 29, 2015 4:41 AM

कल्याण-डोंबिवली मनपाच्या प्रभाग क्षेत्रांतर्गत वॉर्ड क्र. २० रेतीबंदर या वार्डातही अंतर्गत रस्ते, पायवाटा आणि दैनंदिन समस्या पहावयास मिळतात.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या प्रभाग क्षेत्रांतर्गत वॉर्ड क्र. २० रेतीबंदर या वार्डातही अंतर्गत रस्ते, पायवाटा आणि दैनंदिन समस्या पहावयास मिळतात. अनियोजितपणा या वार्डामध्ये आहे. कित्येक वर्षांपासून या वॉर्डातून गेलेल्या गोविंदवाडी पत्रीपूल रस्त्याचे घोंगडे भिजत पडले आहे. याच परिसरात तबेले भरपूर आहे. परिणामी त्यांच्या घाणीची समस्या, तुंबलेली गटारे यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोणत्याही मनपाच्या कर्मचाऱ्यास या परिसरात साफसफाई करण्याची गरज भासत नसल्यासारखे येथे चित्र आहे. पिण्याचे पाणीही कमी दाबाने येत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. या वॉर्डात गोविंद वाडीचा काही भाग, घास बाजारचा काही भाग, रेतीबंदरचा काही भाग, अमृत पामस सोसायटी, काळसेकर इंग्लिश स्कूल, आमान अपार्टमेंट, हजरत इमाम हुसेन चौक, गोविंदवाडी पत्रीपूल रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेला भाग येतो.कल्याणच्या मध्य भागातून जाणाऱ्या वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी गोविंदवाडी-पत्रीपूल या बायपास रस्त्याची आखणी केली होती. परंतू अतिशय संथगतीने हे काम सुरु आहे. परिणामी कल्याणमधील वाहतूकीचा रोज प्रचंड खोळंबा होत आहे. वाहतूक नियंत्रणात आणताना ट्रॅफीक पोलिसांची दमछाक होत आहे. या वॉर्डात रेतीबंदर असल्यामुळे कल्याण खाडी किनारी असलेल्या रेतीबंदर वर असंख्य जड वाहने रेतीची वाहतूक करीत असतात. त्यामुळे येथील रहिवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेतीबंदरवरून सध्या सुरु असलेल्या रस्त्याची चाळण झाली आहे. या वॉर्डात मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान नाही. उद्यानही नाही. दैनंदिन साफसफाई विषयी बोलताना येथील नगरसेवक अयुब कुरेशी हे ही याबाबत आपण असफल झाल्याचे मान्य करतात. पण त्याला पालिकाच जबाबदार असल्याचे ते सांगतात. पालिकेकडे सफाईसाठी कर्मचारीच नसल्याचे सांगतात. वारंवार पालिकेकडून आश्वासन मिळते पण पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. आणि वर्षामागून वर्षे अशीच निघून जातात असे कुरेशी सांगतात. (प्रतिनिधी)