शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

सद्गुरू अर्थात अंतर्मनावर सोपवा आपला ताणतणाव; प्रल्हाद पै यांचे आनंद मेळाव्यात आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 5:46 AM

प्रल्हाद पै यांचे आनंद मेळाव्यात आवाहन

कर्जत : तणाव हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव तुम्ही सद्गुरू यांच्यावर म्हणजे अंतर्मनावर सोपवा, असे आवाहन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी रविवारी आनंद मेळाव्यात केले. जे आहे त्याच्याबद्दल आणि ज्यांच्यामुळे मिळाले आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगा. जो क्षण आहे त्याचा आनंद घ्या आणि सतत सद्गुरू यांचा किंवा परमेश्वराचे स्मरण करा, असे तीन महत्त्वपूर्ण मंत्र त्यांनी तणाव येऊ नये म्हणून यावेळी दिले. 

श्री सद्गुरू वामनराव पै प्रणीत जीवनविद्या मिशनतर्फे ‘आनंद मेळावा’ आयोजित केला आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी ज्यांचा सद्गुरू कार्यात खूप मोठा वाटा आहे, अशा जीवनविद्या मिशनच्या ज्येष्ठ नामधारकांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जीवनविद्या मिशनचे ज्येष्ठ नामधारक रमेश चिंदरकर ऊर्फ नारायण चिंदरकर यांचा जीवनविद्येचे जीवनगौरव पुरस्काराने, तर प्रभाकर नाईक आणि प्रभाकर देसाई यांचादेखील जीवनविद्या गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

जीवनविद्या मिशनतर्फे २०२२ -२३ हे वर्ष सद्गुरूंचे जनशताब्दी वर्षे म्हणून साजरे करण्यात येणार आहे. हे वर्ष ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहित आणि विश्वशांती’ या विचाराने साजरे केले जाणार आहे. या विचाराप्रमाणे जीवनविद्या मिशनचे असंख्य नामधारक वागत असतात. जीवनविद्या मिशनमधील पहिले नामधारक आयएस अधिकारी मकरंद खेतमाळी हे या कार्यक्रमात उपस्थित होते. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून खेतमाळीस हे कार्यरत आहेत. ‘

जीवनविद्या मिशन’ ही संस्था मोठे कार्य करीत आहे. कामामुळे या कार्यात सहभागी होणे शक्य होत नाही पण या कार्याचा मुख्य हेतू ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची’ याप्रमाणे वागण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. क्षणोक्षणी सद्गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाची महती मला आली’  असे खेतमाळी यांनी यावेळी सांगितले.   

टॅग्स :Karjatकर्जत