शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

साकीब नाचन तुरुंगाबाहेर, पाच महिने आधी सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 06:03 IST

ठाणे : २00२-0३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन याची बुधवारी ठाणे कारागृहातून सुटका करण्यात आली.

ठाणे : २00२-0३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन याची बुधवारी ठाणे कारागृहातून सुटका करण्यात आली. दहा वर्षे कारावासाची शिक्षा झालेल्या साकीबचे तुरूंगातील चांगले वर्तन विचारात घेऊन जवळपास पाच महिने आधी त्याला मुक्त करण्यात आले.डिसेंबर २00२ ते मार्च २00३ या काळात १३ लोकांचा बळी घेणाºया मुंबई सेंट्रल, विलेपार्ले आणि मुलुंड येथील तीन बॉम्बस्फोटांमध्ये विशेष पोटा न्यायालयाने १0 आरोपींना शिक्षा ठोठावली होती. त्यात वाणिज्य शाखेचा पदवीधर असलेल्या साकीबचाही समावेश होता. तो ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील असून, वादग्रस्त सिमी संघटनेचा महासचिव होता. ५७ वर्षीय साकीब ठाणे कारागृहातील अंडा सेलमध्ये होता. एप्रिल २0१६ मध्ये त्याला दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. खटल्याच्या काळातही तो तुरूंगातच असल्याने तेवढी वर्षे शिक्षेतून वगळण्यात आली होती.बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान पडघा येथील काही उच्चशिक्षित तरूणांचीही चौकशी करण्यात आली होती. साकीब तुरूंगात जास्त कुणाशी बोलत नव्हता. तुरूंगात तो अतिशय शांत आणि अलिप्त राहत असे, असे तुरूंग अधिकाºयांनी सांगितले. साकीबला वाचनाची आवड आहे. तुरूंगात त्याने कायद्याचा अभ्यास केला. न्यायालयात त्याची बाजू तो स्वत:च मांडत होता. साकीबची पाच महिने १३ दिवस आधी सुटका करण्यात आली असल्याचे तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी सांगितले.>नियमित प्रक्रियेचा भागचांगल्या वर्तणुकीच्या आधारावर सर्वच कैद्यांची लवकर सुटका होते. तुरूंगात वर्तन चांगले असेल तर प्रत्येक कैद्याच्या शिक्षेतून वर्षाचे ठराविक दिवस वगळले जातात. सरते शेवटी या वगळलेल्या दिवसांची गोळा बेरीज करून कैद्याची लवकर सुटका केली जाते. साकीबची सुटका याच प्रक्रियेचा भाग असल्याचे तुरूंग अधिकाºयांनी सांगितले.पार्श्वभूमीडिसेंबर २00२ ते मार्च २00३ या काळात झालेल्या तीन बॉम्बस्फोटांमध्ये १३ जणांचा मृत्यू, तर १४७ जण जखमी झाले होते.६ डिसेंबर २00२ रोजी पहिला बॉम्बस्फोट मुंबई सेंट्रल येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये झाला होता. त्यादिवशी अयोध्या येथील बाबरी मशिद उद््ध्वस्त करण्याच्या घटनेला १0 वर्षे पूर्ण झाली होती. या घातपातामध्ये २७ जण जखमी झाले होते.२७ जानेवारी २00३ रोजी विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर एका सायकलवर बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. यामध्ये एका महिलेचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले होते. यादिवशी गोधरा हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले होते.१३ मार्च २00३ रोजी सीएसटी येथून कर्जतला जाणाºया लोकलमध्ये स्फोट घडविण्यात आला होता. यामध्ये १२ जणांचा मृत्यू तर ९0 पेक्षा जास्त लोक जखमी झाले.

टॅग्स :thaneठाणे