शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

उल्हासनगर पालिका कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:40 AM

उल्हासनगर : जीएसटी अनुदानाअभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. बुधवारी दुपारी ...

उल्हासनगर : जीएसटी अनुदानाअभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. बुधवारी दुपारी कामगार नेते दिलीप थोरात यांनी मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्या केबिनसमोर ठिय्या आंदोलन केल्यावर वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास मान्यता दिल्याची माहिती थोरात यांनी दिली.

उल्हासनगर महापालिका आस्थापनाचा दरमहा एकूण खर्च १९ कोटींपेक्षा जास्त असून, त्यापैकी कर्मचाऱ्यांच्या पगारावर १२ कोटी खर्च होतो, तर महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. दरम्यान, मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. सरकारकडून अनुदान येण्यास विलंब झाल्याचे कारण महापालिका प्रशासनाने देत महिन्याची १७ तारीख उलटून गेल्यावरही पगार झाला नसल्याने कामगारांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. अभय योजनेअंतर्गत वसुली झालेल्या २० कोटींच्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार अदा का केले नाही? असा प्रश्न कामगारांकडून करण्यात आला.

कर्मचाऱ्यांचा पगार न देता अभय योजनेअंतर्गत जमा झालेला निधी गेला कुठे? असा प्रश्न विचारल्यावर, महापालिका प्रशासनाने याबाबत मौन बाळगले. कर्मचाऱ्यांचा पगार देण्याऐवजी महापालिकेने कंत्राटदारांची देणी प्रथम दिल्याने टीकेची झोड उठली. अखिल भारतीय काँग्रेस मजदूर संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग टांक यांनी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होत नसेल तर त्यांच्या पगाराच्या रकमेवर सहा टक्के व्याज सरकारी नियमानुसार देण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महापालिकेची कोंडी झाल्यावर सरकारकडे जीएसटी अनुदान त्वरित देण्याची मागणी करावी लागली. तसेच थोरात यांच्या ठिय्या आंदोलनामुळे वर्ग-४च्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा निर्णय घेतला. तसेच वर्ग-३ यांच्यासह अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्ती वेतन देणार असल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली.

---------------------------------------------

जाब विचारल्यावर बाब झाली उघड

कर्मचारी संघटनेने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केल्यावर अभय योजनेचे २० कोटी कंत्राटदारांना देण्यावर खर्च झाल्याचे उघड झाले. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर प्रशासनाचे धाबे दणाणले होते.