शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

भिवंडीत बोगस खतांची विक्री; खत पाण्यात न विरघळता बनले प्लास्टिकचे बोळे

By नितीन पंडित | Published: August 03, 2023 5:28 PM

शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत.

भिवंडी: भिवंडीत बोगस खत विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत. याप्रकरणी त्रस्त शेतकऱ्याने गुरुवारी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून बोगस खत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांचा पुरवठा शासनाच्या अधिकृत कृषी सेवा केंद्रातून  होत असताना अंबाडी परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केलेली खते ही बोगस असल्याची व त्यासोबतच खतांच्या किमतीपेक्षा अधिक पैसे घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदारांना देत दिलेल्या निवेदनात केले आहे.

अंबाडी ,दाभाड,दिघाशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आज ही भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.तेथील असंख्य शेतकऱ्यांनी दाभाड येथील पल्लवी कृषी सेवा केंद्रातून १८:१८:१० हे खत खरेदी केले होते.परंतु मागील काही दिवसात झालेल्या पावसात शेतात टाकलेले खत हे पाण्यावर तरंगताना दिसले.त्यामुळे शेतकरी शिवाजी राऊत यांनी शंका घेऊन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर कृषी अधिकारी राहुल शिरसाड,पंचायत समिती कृषी अधिकारी निता गवळी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता खत विक्री दुकानातील प्रतिनिधी ज्ञानेश्वर काचवे यांनी सुध्दा खत पाण्यावर तरंगत असल्याचे जबाबात मान्य केले आहे.

भात लागवड जोमाने व्हावी यासाठी शेतकरी पदरमोड करून खत खरेदी करीत आहे पण ते बोगस निघाल्याने त्याचा परिणाम शेती उत्पन्ना  वर होणार असल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानास कोण जबाबदार राहणार असा सवाल शेतकरी शिवाजी राऊत यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.तर या भागात युरिया खत हे शासनाने जाहीर केलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीला विक्री केले जात असल्याची तक्रार देखील शिवाजी राऊत यांनी तहसीलदार अधिक पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी