शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

कापडनिर्मिती उद्योगांना चालना देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या आमदारांचे विधिमंडळ प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 21:02 IST

textile industry: आर्थिक मंदीमुळे कमी होत चाललेला भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी शहरांतील यंत्रमाग कापड उद्योग आता लॉकडाऊनमूळे डबघाईला आला आहे

- नितिन पंडीतभिवंडी - आर्थिक मंदीमुळे कमी होत चाललेला भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी शहरांतील यंत्रमाग कापड उद्योग आता लॉकडाऊनमूळे डबघाईला आला आहे आणि शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा आणि यंत्रमाग मालक आणि त्यातील कामगारांना दिलासा मिळण्यासाठी विशेष असे राहत पॅकेज देण्यात यावे यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Samajwadi Party MLAs hold agitation at the entrance of the legislature to give a boost to the textile industry)

भिवंडीतील यंत्रमागाद्वारे कापडनिर्मिती करणारा उदयोग लॉकडाऊनमूळे आणि आर्थिक मंदीमुळे डबघाईला आला आहे त्यामुळे या उद्योगाचे पुनरुज्जीवन करून त्यात स्थिरता आणून यंत्रमाग उद्योग वाढीसाठी योग्य ती कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे जून महिन्यात लेखी निवेदनाद्वारे केली होती. 

 दिवसेंदिवस यार्नचे भाव वाढत आहेत जानेवारी २०२१ मध्ये ६० एस या दर्जाच्या सुताचे दर ९५० रुपये प्रति पाच किलो होते आणि जून महिन्यात त्याचे दर १४५० रुपये प्रति पाच किलो झाले आहेत.त्याचप्रमाणे ९० नंबरचा सुपर फाईन कॉटन यार्न १८५० वरून २५०० रुपये झाला आहे. त्यामुळे त्याद्वारे तयार होणाऱ्या कापडाची किंमत वाढली आहे परंतु किंमत वाढल्याने त्याप्रमाणात त्याचा खप होत नाही आहे. त्याचप्रमाणे यंत्रमागधारक मालकांना शासनाकडून आर्थिक तरदूत करण्यात येऊन लॉक डाऊन काळातील वीज माफ करण्यात यावे अथवा त्यात सवलत मिळावी आणि लॉकडाऊन काळातील बँकेच्या कर्जावरील व्याज माफ करावे आणि त्यात सवलत द्यावी आणि टीयुएफ योजनेअंतर्गत रिपेअर लूम लावलेल्या यंत्रमाग धारकांचे कर्जावरील व्याज माफ करावे तसेच त्यात सवलत देण्यात यावी यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येऊन एवढ्या मोठ्या कापड उद्योग असलेल्या शहरात त्यासाठी मार्केट नाही त्यामुळे याठिकाणी कापड मार्केट तसेच यार्न मार्केट तयार करण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्या आ. रईस शेख यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केेल्या होत्या, त्याविषयी कार्यवाही करण्याची मागणी करत शहरातील कापड निर्मिती उद्योगाचे पुनरुज्जीवन करून त्यात स्थिरता येऊन कापड उद्योग वाढीसाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी केली होती. परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Textile Industryवस्त्रोद्योगSamajwadi Partyसमाजवादी पार्टीMaharashtraमहाराष्ट्र