शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भिवंडी महापालिका शाळांच्या दुरुस्तीसाठी समाजवादीचे शिक्षण मंत्र्यांना साकडे

By नितीन पंडित | Updated: October 5, 2023 19:24 IST

भिवंडी शहरातील बाराहून अधिक प्राथमिक शाळा इमारती या नादुरुस्त झाल्या असून त्यामुळे काही शाळा इमारती बंद करण्यात आल्या आहेत,तर काही शाळा इमारती लवकरच बंद होणार आहेत.

भिवंडी :भिवंडी महापालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा इमारतींची दुरावस्था झाली असून या शाळेमधील शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने या बाबींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे याकरता  समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव रियाज आजमी व भिवंडी शहरातील पक्ष पदाधिकारी माजी नगर सेवक फराज बहाउद्दीन बाबा, रियाज शेख,आलमगीर खान यांच्या शिष्टमंडळाने प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत त्यांच्याकडे येथील शाळांच्य  दुरुस्तीचा मुद्दा मांडला.

भिवंडी शहरातील बाराहून अधिक प्राथमिक शाळा इमारती या नादुरुस्त झाल्या असून त्यामुळे काही शाळा इमारती बंद करण्यात आल्या आहेत,तर काही शाळा इमारती लवकरच बंद होणार आहेत.त्यामुळे अशा शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या गरीब व कामगार वस्तीतील गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची चिन्ह दिसून येत असून विद्यार्थ्यांचे भविष्य चुकीच्या मार्गाने जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन भिवंडी पालिका हद्दीतील सर्व शाळा इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने रियाज आजमी यांनी केली आहे.

निज़ामपुर परिसरात असलेल्या पालिका शाळा इमारती धोकादायक झाल्याचे घोषित करून तेथील सुमारे १२०० विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये स्थलांतरीत केले आहे. त्या मुळे हे विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नाहीत . त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती होत आहे अशी चिंता माजी नगरसेवक फराज बहाउद्दीन बाबा यांनी व्यक्त केली.

पालिकेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याने शाळा इमारती दुरुस्ती व नव्याने उभारण्यासाठी निधी नसल्याने शाळा बंद केल्या जाण्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्या साठी राज्य शासनाने इमारत उभारणी साठी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी रियाज आजमी यांनी केली आहे.  पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेंचेस नाहीत,स्वच्छ पिण्याचे पाणी ,शौचालय या सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली गेली.या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवकरच आपण भिवंडी शहराला भेट देऊन तेथील परिस्थिती समजून घेऊन शासनाकडून योग्य त्या निधीची तरतूद करू असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिष्टमंडळास दिले आहे.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीAbu Azmiअबू आझमी