शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

शालेय वाटदेखील बिकटच!

By admin | Published: July 23, 2015 3:53 AM

शैक्षणिक साहित्याविना कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला असताना काही शाळांभोवतीचा परिसरदेखील फारसा

प्रशांत माने , कल्याणशैक्षणिक साहित्याविना कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला असताना काही शाळांभोवतीचा परिसरदेखील फारसा आलबेल नाही, याची प्रचिती पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील साने गुरुजी प्राथमिक शाळा पाहतांना येते. शाळेत जाण्याची वाट अरुंद आणि त्यातच चिखल, घाण अशा दलदलीतूनच विद्यार्थी आणि शिक्षकांना ये-जा करावी लागत आहे.येथील विद्यार्थी पटसंख्या ८८ असून बालवाडीत १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. १९४९ पासून अस्तित्वात असलेल्या या शाळेच्या वास्तूची अवस्था सद्य:स्थितीला धोकादायक अशीच आहे. बाजूलाच शाळेच्या नव्या वास्तूचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. परंतु, दोन महिन्यांपासून हे काम बंद पडलेले आहे. त्यामुळे सध्या जुन्या वास्तूत अस्तित्वात असलेल्या एका खोलीतच वर्ग भरविले जात आहेत. सकाळी पाचवी ते सातवी तर दुपारी पहिली ते चौथी असे वर्ग आलटूनपालटून भरतात. या ठिकाणी ३ संगणक दिले आहेत. परंतु, ते बंद असल्याने विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित आहेत. शाळेला ५ शिक्षक असले तरी निवडणुकीच्या मतदार याद्या बनविणे, हगणदारीमुक्त गाव या योजनेंतर्गत शौचालयांचा सर्व्हे करणे अशा कामांची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य कोणतेही शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. दोन दिवसांपासून चिककी देण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे शिक्षण मंडळाच्या होत असलेल्या दुर्लक्षा प्रकरणी सोमवारच्या केडीएमसीच्या महासभेत सदस्यांकडून अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले होते. यावर तत्काळ समस्यांचे निवारण करण्याची आणि सुविधा पुरविण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. एकंदरीतच परिस्थिती पाहता शिक्षण मंडळ यातून काही बोध घेईल, याबाबत मात्र साशंकता आहे.