शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

सांडपाण्याच्या पाईपलाईनसाठी प्रलोभने

By admin | Published: March 08, 2016 1:41 AM

तारापूर एमआयडीसीच्या नवापूर गावातून नेण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना नोकरी-पैशाची प्रलोभने दाखवून

हितेन नाईक,  पालघरतारापूर एमआयडीसीच्या नवापूर गावातून नेण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना नोकरी-पैशाची प्रलोभने दाखवून चुकीच्या पद्धतीने करारनामे काही लोकांकडून लिहून घेण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र काही जागृत शेतकऱ्यांनी आजही हया प्रलोभनला बळी न पडता हा डाव उधळूण लाऊन आपल्या शेतातून पाइपलाइन टाकण्यास मज्जाव केला आहे.तारापुरच्या औद्योगिक वसाहती मधील कारखान्या मधून बाहेर निघणारे प्रदूषित सांडपाणी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) पाठवले जाते. तेथून हे प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करुन ते नवापूर मधून गेलेल्या पाइपलाइन मधून थेट नवापुर-अलेवाडीच्या समुद्रात ४० वर्षापूर्वीपासून सोडले जात होते. ही पाइपलाइन जिर्ण आणि नादुरुस्त झाल्याने या पाइपलाइन मधून निघणारे प्रदूषित सांडपाणी नवापूर, पाम इ.भागातील शेतात, बागायती क्षेत्रात शिरुन हे क्षेत्र नापिक बनले आहे. त्या मुळे मागील १५-२० वर्षापासून इथल्या शेतकऱ्यानी भात पीक ,भाजीपाला पिक घेणे बंद केले आहे. त्या मुळे अनेकांना आपल्या जमीनी कवडी मोल दराने विकण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते. १५ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान प्रदूषित पाण्याची पाइपलाइन फुटून लाखो लीटर सांडपाणी अनिल मेहेर इ.सह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात, विहिरित घूसले होते. या संदर्भात एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या नंतर १९ सप्टेंबरला ४ दिवस उशिराने प्रदुषण मंडळाचे अधिकारी पंचनामे करण्यासाठी मेहेर यांच्या बागायतीत पोहचले. त्यावेळी कुणीही पंच न सापडल्याचे कारण देऊन अधिकारी निघून गेले. त्या नंतर २४ सप्टेंबर रोजी म्हणजे १० दिवसांनी या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु मधल्या काळात मुसळधार पाऊस पडल्याने बागायती क्षेत्रासह विहिरित गेलेल्या प्रदूषित पाण्याची तीव्रता कमी झाली होती. त्याच पाण्याचे सॅम्पल प्रदुषण मंडळाने नेल्याने येणारा रिपोर्ट हा एमआयडीसी आणि प्रदुषण मंडळाच्या बाजूने येऊन प्रदूषणाची तीव्रता कमी असल्याची नोंद येणार आहे. त्यामुळे हेतु पुरस्कर मुद्दाम पंचनामा उशिरा करण्यात आल्याचा आरोप मेहेर यांनी केला आहे. याघटने मुळे मेहेर यांच्या बागायती मधील ७९ नारळ झाडे, २४ आंबा, ४१ केळी, २१ फणस अशी सुमारे २८४ झाडांच्या मुळाशी प्रदूषित पानी शिरून झाडे मरणावस्थेत पोहोचली आहेत. ६ महिने उलटून ही त्याना कुठलाही नुकसान भरपाई मिळालेली नाही.