शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

"अरुंद वस्तीतील आग विझवणारी यंत्रणा आधी उभारा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 12:53 AM

संतप्त नागरिकांची मागणी

भाईंदर :  मीरा- भाईंदर महापालिकेने मोठा गाजावाजा करत तब्बल १७ कोटी खर्चून ६८ मीटरपर्यंत पोहचणारी अग्निशमन दलासाठी परदेशी वाहन खरेदी केले आहे. हे वाहन बिल्डरांना उंच इमारतीच्या परवानगी मिळाव्यात यासाठी खरेदी केल्याचा आरोप करत आधी अरुंद वस्तीत लागणाऱ्या आगी विझवण्याची यंत्रणा उभारा असा संताप व्यक्त होत आहे.शुक्रवारी महापालिका आणि सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करत ६८ मीटर उंचीपर्यंत जाणारी टर्न टेबल लॅडर ही परदेशी बनावटीची अग्निशमन गाडी १७ कोटींना खरेदी केली. ही गाडी खरेदी करणारी मीरा- भाईंदर ही देशातील पहिली महापालिका असल्याचा टेंभाही मिरवण्यात आला. परंतु शहरातील गाव परिसर व अरुंद भागात आग लागल्यास ती विझवण्यासाठी मात्र महापालिकेकडे आजही यंत्रणा नसल्याने १७ कोटींची गाडी कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल नागरिक करत आहेत. भाईंदरच्या उत्तन परिसरात वेलंकनी तीर्थमंदिराजवळ असलेल्या डोंगरावर नुकतीच मोठी आग लागली. परंतु ही आग विझवण्यासाठी उत्तन अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहन घटनास्थळी घेऊन जाण्यास अरुंद रस्त्यांमुळे विलंब झाला.अग्निशमन दलाच्या वाहनास पोहचण्यास विलंब लागल्याने आग वेगाने पसरली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगरावरील झाडे झुडपे नष्ट झाली. या ठिकाणी स्थानिकांसह पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शहरातील अरुंद ठिकाणी वसाहतीमध्येही अनेकवेळा अग्निशमन वाहने पोहचण्यास विलंब होतो जेणेकरून आगीची तीव्रता वाढून नागरिकांचे जास्त नुकसान होते. परंतु जुने मीरा- भाईंदर शहर, गावठाण, औद्योगिक वसाहती तसेच उत्तन परिसरात रस्ते अरुंद असल्याने आग लागल्यास वा आपत्ती आल्यास अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी पोहचू शकत नाही. त्यामुळे अशा अरुंद परिसरातील नागरिकांच्या बचाव व सुरक्षे साठी लहान आकाराची अग्निशमन वाहने तसेच अन्य पर्यायी सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तसे असताना महापालिका आणि सत्ताधारी भाजपला मात्र बिल्डरांना अतिशय उंच इमारतींच्या परवानगी मिळावी आणि त्यांना खूष ठेवता यावे म्हणून हे वाहन खरेदी केले. परंतु गावठाण, जुन्या शहरातील अरुंद वसाहतीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मात्र लहान अग्निशमन वाहने व पर्यायी यंत्रणेसाठी खर्च करण्याची दानत मात्र नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी केला आहे. नागरिकांनी कारभारावर संताप व्यक्त केला आहे.लहान वाहनासाठी सतत मागणीउत्तन परिसरासाठी लहान आकाराची अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची पालिकेकडे सतत मागणी करूनही पालिका व सत्ताधारी यांना मात्र नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे सोयरसूतक नाही असे गंडोली यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक