शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी टाकला ठामपा मुख्यालयासमोर कचरा

By अजित मांडके | Updated: March 19, 2025 12:26 IST

ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सी पी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो.

ठाणे :  ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात  कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश येत नाही. त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला. 

शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सी पी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो. परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्या रस्त्यावर तसेच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला.   

दरम्यान, महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही व त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही. सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकला आहे. जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :thaneठाणेSharad Pawarशरद पवारGarbage Disposal Issueकचरा प्रश्न