शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याबाबत शरद पवार निर्णय घेतील, अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 13:21 IST

Ajit Pawar : कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून कायदे तयार केले आहेत. मात्र त्याच कायद्यांचा अशा चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. न केलेल्या गुन्ह्यात विरोधकांना अडकवले जात असेल तर तो माणूस खचणार.

ठाणे  : कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून कायदे तयार केले आहेत. मात्र त्याच कायद्यांचा अशा चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. न केलेल्या गुन्ह्यात विरोधकांना अडकवले जात असेल तर तो माणूस खचणार. त्यामुळेच व्यथित होऊन आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र आव्हाड हे शरद पवार यांना दैवत मानतात. त्यांचा जो निर्णय असेल तो आव्हाड यांना पाळावाच लागेल, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यात केले. 

आव्हाड यांना पद्धतशीर गोवण्याचा प्रयत्न होत असून, घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री त्या महिलेसोबत दिसत असल्यामुळे या प्रकाराची योग्य चौकशी करून जे दोषी असतील त्यांचा व मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. 

पवार म्हणाले की, ७२ तासांत माजी कॅबिनेट मंत्र्यांवर दोन-दोन गुन्हे दाखल होतात, हे घाणरडे राजकारण सुरू आहे. आज सरकार बदलल्याने विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करीत असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे. सरकार येत असते, जात असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि पोलिसांनी हे सांगणे अपेक्षित होते की, आव्हाड यांनी कुठलेही गैरकृत्य केलेले नाही. अशा पद्धतीने राजकारण करून लोकशाही, राज्यघटना याला तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे.

मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही - पवार राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, असे पवार यांनी सांगितले. सध्याच्या सरकारकडे १४५ आमदारांचा पाठिंबा आहे, तो कमी होईल असे चित्र दिसत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमच्याकडेही १४५ आमदारांचे संख्याबळ होते. मात्र एक गट बाहेर पडल्याने सरकार कोसळले. परंतु संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाकीत कसे केले, याची माहिती मी त्यांच्याशी चर्चा करून घेईन, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार