शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

‘शिवसेनेने ठाण्याचे वाटोळे केले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:55 AM

ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच

- लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच शिवसेनेने शहराचे वाटोळे केल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्ता असतांनाही आजही शहरात लोडशेंडींगचा प्रश्न कायम आहे, शहरासह कळवा, मुंब्रा या भागात पाच ते सहा तास वीज गायब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही सत्तेत असतांना ठाण्यातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या होत्या. तसेच आता राज्यासाठी पुरेशी वीजही उपलब्ध आहे. परंतु,असे असतांनाही ठाण्यासारख्या शहराला वीजेचा प्रश्न भेडसावत असेल तर हे सत्ताधारी शिवसेनेचे अपयशच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला. नियोजनाचा उडालेला बट्टयाबोळ, पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही. शाई धरणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षे खीतपत पडला आहे, त्यावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही, किंबहुना या कामाला गती का मिळाली नाही, असा सवालही त्यांनी केला. गडकरी रंगायतनावर आता म्हणे छत अंथरण्याचे काम सुरु आहे. परंतु, आधीच जर त्याचे पीओपी मजबुत केले असते तर आज हा पैसा खर्च करण्याची वेळच का आली असती असा सवालही त्यांनी केला.स्थायी समिती नाहीघाणेकर नाट्यगृहाचे छत कोसळतेच कसे, दीड वर्ष उलटूनही ते खुले का केले नाही, मेट्रोबाबत खंबीर पावले का उचलली जात नाहीत, घनकचऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे, शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही, रस्त्यांची चाळण झालेली आहे, परिवहनची सेवा सक्षम नाही, महापालिका निवडणूक पार पडूनही स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही, हे सत्ताधारी शिवसेनेचेच पाप असल्याचे ते म्हणाले.