शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

पालिकेतील शिवसेना-भाजपाची युती अभेद्यच

By admin | Published: February 28, 2017 3:27 AM

शिवसेना-भाजपाची कल्याण-डोंबिवलीतील युती कायम राहील आणि पुन्हा परिवहनच्या निवडणुकीत ते दिसून येईल

कल्याण : आधी भांडून, वेगळे लढून नंतर एकत्र सत्तेसाठी आलेल्या शिवसेना-भाजपाची कल्याण-डोंबिवलीतील युती कायम राहील आणि पुन्हा परिवहनच्या निवडणुकीत ते दिसून येईल, हे ‘लोकमत’चे वृत्त संतोतंत खरे ठरले आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याला दुजोरा दिला असून यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याशी माझी चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर देवळेकर यांनीही श्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य असेल, असे सांगितल्याने केडीएमसीतील युती अभेद्यच राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले.मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिकेच्या प्रचारात शिवसेना-भाजपा एकमेकांविरोधात लढले. परस्परांवर टीकेची झोड उठविताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील निवडणुका युती करून लढविणे गैरसोयीचे होते. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची खेळी दोन्ही पक्षांनी खेळली. आता निवडणुका पार पडल्याने या दोन्ही पक्षांनी सर्व निवडणुका ठरलेल्या जागावाटपानुसार एकत्र लढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांवर डोळा ठेवून असलेल्या मनसेला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. परिवहनची निवडणूक उद्या, मंगळवारी दुपारी २ वाजता होणार आहे. त्यातील सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी तीन; तर मनसेचा एक सदस्य आहे. संख्याबळ पाहता भाजपाला तिसरा सदस्य निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या मदतीची गरज आहे. ती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री चव्हाण यांनी भाजपाच्या गटनेता कार्यालयात नगरसेवकांची विशेष बैठक घेतली. अन्य महापालिका निवडणुकांच्या धामधुमीनंतर ते प्रथमच केडीएमसीत आले होते. (प्रतिनिधी) >‘लोकमत’च्या वृत्ताची चर्चा शिवसेना आणि भाजपमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर परिवहनच्या निवडणुकीत युती राहणार का? अशा तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘युती राहणार कायम’ असे वृत्त प्रसिद्ध करत त्यामागचे राजकारण उलगडून सांगितले. या वृत्ताची चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, राज्यमंत्र्यांपाठोपाठ महापौरांनीही युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने मनसेच्या गोटात नाराजी पसरली आहे. पालिकेतील राजकारणात भाजपाविरूद्ध आपला वापर झाल्याची त्यांची भावना झाली.