शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

धक्कादायक! मोबाईल हिसकावल्याने महिला प्रवाशाचा मृत्यु: चोरटा अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 12:07 AM

चालत्या रेल्वेमध्ये मोबाईल खेचून पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटयाला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात विद्या ज्ञानेश्वर पाटील (३५) या महिलेचा शनिवारी कळवा स्थानकाजवळ मृत्यु झाला होता. या प्रकरणात फैजल शेख (३१, रा. मुंब्रा) या सराईत चोरटयाला ठाणे रेल्वे पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.

ठळक मुद्दे ठाणे रेल्वे पोलिसांची कामगिरी आरोपी निघाला सराईत चोरटा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चालत्या रेल्वेमध्ये मोबाईल खेचून पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटयाला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात विद्या ज्ञानेश्वर पाटील (३५) या महिलेचा शनिवारी कळवा स्थानकाजवळ मृत्यु झाला होता. या प्रकरणात फैजल शेख (३१, रा. मुंब्रा) या सराईत चोरटयाला ठाणे रेल्वे पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. त्याला ४ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण रेल्वे न्यायालयाने दिले आहेत.डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या विद्या या २९ मे रोजी अंधेरी येथून उपनगरी रेल्वेने घरी परतत होत्या. ही रेल्वे रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास कळवा रेल्वे स्थानकात आली. या स्थानकातून रेल्वे पुढे जात असतांनाच आधीच धबा धरुन बसलेला एक चोरटा रेल्वेत शिरला. त्याने विद्या यांच्याशी झटापट करीत त्यांचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर तो खाली उतरला. त्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन त्या खाली उतरल्या. परंतू, तोपर्यंत फलाट संपला. त्यामुळे त्या थेट रेल्वेतून खाली कोसळल्या. यातच गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यु असल्याचे रेल्वे पोलिसांना वाटले. परंतू, याच डब्यातील एका महिला प्रवाशाने दिलेल्या माहितीच्या आधारे हा जबरी चोरीचा प्रकार समोर आला. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास डोळे आणि दिनेश कुलकर्णी आदींच्या पथकाने सीसीटीव्ही आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फैजल या सराईत गुन्हेगाराला मुंब्य्रातून अटक केली. त्याच्यावर यापूर्वी २१ गुन्हयांची नोंद आहे.* पाच दिवसांपूर्वीच सुटला जामीनावर-रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला फैजल हा २५ मे रोजी न्यायालयातून १५ हजारांच्या जामीनावर सुटला होता. त्याला तीन महिन्यांपूर्वी ठाणे रेल्वे पोलिसांनी अशाच एका जबरी चोरीमध्ये अटक केली होती.* तीन मुली झाल्या आईला पोरक्या-एका खासगी आयात निर्यात करणाºया कंपनीमध्ये विद्या पाटील या नोकरीला होत्या. त्या दररोज डोंबिवली ते अंधेरी रेल्वेने प्रवास करीत होत्या. त्यांना सहा वर्षीय, चार वर्षीय आणि एक तीन महिन्यांची अशा तीन मुली आहेत. केवळ एका मोबाईल चोरटयामुळे या मुलींना आपल्या आईला मुकावे लागल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र