शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

‘अवकाळी’चा फटका!

By admin | Published: March 05, 2016 1:36 AM

सकाळी शहरी व ग्रामीण भागात अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळला

ठाणे : जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारपासून अवकाळी पावसाच्या तुरळक सरी झाल्या. मात्र, शुक्रवारी सकाळी शहरी व ग्रामीण भागात अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळला. या पावसाचा आंब्याच्या मोहराला तसेच भेंडी, काकडी, वांगी आदी भाज्यांना फटका बसला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. मात्र, त्याच वेळी ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी शहरी भागांत तरुणाईने हा पाऊस एन्जॉय केला.गेल्या पाच-सहा दिवसांपासून उकाडा वाढल्याने लोक हैराण झाले होते. गुरुवारी सायंकाळपासून काही भागांत पावसाचा शिडकावा सुरू झाला. शुक्रवारी सकाळपासून हवामान ढगाळ होते. सकाळी साडेनऊ-दहा वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. रस्ते चिंब भिजले. सकाळी कार्यालय गाठणाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. दिवा येथे पेंटाग्राफ जळाल्याने तर बदलापूर येथे वीजपुरवठा खंडित झाल्याने उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती. जिल्ह्याच्या काही भागांतून फळभाज्या, पालेभाज्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. आंब्याच्या मोहरालाही पावसाने फटका दिला. काजूचेही नुकसान केले. एकीकडे ग्रामीण भागात यामुळे शेतकरी हताश झालेला असताना शहरी भागांत तरुणाईने पावसाचा आनंद लुटला. तलावपाळी, उपवन परिसरात तरुणाई पावसाचा आनंद घेताना दिसली.भिवंडी : पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावरील अंजूरफाटा व माणकोली भागांत मुख्यत्वे वाहतूककोंडी झाली होती. अचानक झालेल्या पावसामुळे दहावीच्या परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठताना त्रास झाला. पहाटे ५ वाजल्यापासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या उन्हाळ्याने बेजार झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला. अडगळीतील छत्र्या बाहेर निघाल्या. काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने यंत्रमाग बंद पडले. दुपारी पाऊस थांबल्याने शहरातील व्यवहार पूर्ववत सुरू झाले.