शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

झटपट लसीकरणामुळे ठाण्यात लसीची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:38 AM

ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी तब्बल पाच लाख ४८ हजार लसींच्या कुपी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील सहा महापालिका, ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी तब्बल पाच लाख ४८ हजार लसींच्या कुपी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात मागणीनुसार टप्प्याटप्प्याने लसींचे वाटप केले जात असताना ठाण्यात झटपट लसीकरण करण्याकरिता अपेक्षेपेक्षा जास्त लसीकरण केंद्रे सुरू केल्याने आता लसींचा तुटवडा भासू लागला असल्याचे उघड झाले आहे.

जानेवारीमध्ये लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्स अर्थात डॉक्टर्स, कर्मचारी यांना लस दिली. विविध संस्थांनी केलेल्या मागणीनुसार लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येत होते. पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्याला ७४ हजार लसींचे डोस प्राप्त झाले होते. दुसऱ्या टप्प्यात ६४ हजार ५०० लसींचे डोस प्राप्त झाले. आतापर्यंत तब्बल पाच लाख ४८ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. जिल्ह्याला लसींचा अपुरा साठा मिळाला नाही. परंतु ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी, पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ठाण्यात १०० जणांचे लसीकरण होत होती. ती संख्या ३०० पर्यंत वाढवण्यात आली. लसीकरण केंद्रांची प्रारंभी असलेली संख्या नऊ होती. अल्पावधीत ती संख्या ५१ करण्यात आली. या केंद्रांच्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे १० हजार जणांचे लसीकरण करण्यात येत होते. लसीकरणाची संख्या ठाण्यात भरमसाठ वाढल्याने आता लसींचा नवा साठा लागलीच उपलब्ध होत नाही आणि मागे प्राप्त लस उपलब्ध नाही, अशा कात्रीत ठाणे शहर सापडले आहे. सध्या ११ खासगी आणि २६ सार्वजनिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

ठाणे महापालिकेला आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५०० कोव्हीशिल्डचा साठा प्राप्त झाला होता. त्यापैकी ९४ हजार ४२ लसींचा वापर झाला असून ६३ हजार ६७० शिल्लक आहेत. ज्यांना कोव्हीशिल्डची लस अगोदर दिलेली आहे, त्यांना तीच दिली जाणार असल्याची माहिती डॉ. राजू मुरुडकर यांनी दिली. सध्या कोव्हक्सिन लसीचा तुटवडा झाल्याने कोव्हीशिल्ड घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी राखून ठेवलेली लस पहिला डोस घेण्यास येणाऱ्यांना दिली जात आहे. कोव्हॅक्सिनचे ३९ हजार २२० डोस उपलब्ध झाले होते. त्यातील १८ हजार ३९५ डोस देण्यात आले असून आतापर्यंत १ लाख १२ हजार ४३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

.............