शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
2
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
3
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
4
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
5
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
7
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
9
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
10
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
11
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
13
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
14
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
15
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
16
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
17
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
18
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
19
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
20
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे योगदान काय असा प्रश्न मतदात्यांनी विचारावा का?, आनंद परांजपे यांचा सवाल

By अजित मांडके | Published: March 13, 2024 4:43 PM

असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुकदर्शक न बनता आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय ? बारामतीत पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करु नका, सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य काय आहे ? मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते ? त्यांना मतदान करताना कल्याणच्या जनतेने असे म्हणायचे का ? अशाप्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारु शकते. तसेच शिवराळ विजय शिवतारे यांच्याविरोधात ते कोणती कारवाई करणार आहेत ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

राज्यात महायुतीच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात असतांना स्थानिक पातळीवर मात्र महायुतीत बिघाडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन पुन्हा एकदा अनेक आरोप केले.  एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसºयांदा पंतप्रधान बनविण्यासाठी माननीय भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सन्मान करतो, आणि त्याही पलिकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावान आहे, असे वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे.  मुख्यमंत्री  शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. की, निष्ठेची व्याख्या काय ? महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मयार्दा बाळगलेली आहे. पण गेले दोन दिवसापासून शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत. राष्ट्रवादीच्या शक्तिस्थळावर आघात करीत आहेत. परंतु मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनलेले आहेत. त्यांना  समज देखील देण्यात आलेली आहे की नाही हे देखील महाराष्ट्राला माहित नाही. शिंदे यांनी सांगावे विजय शिवतारे यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार ? कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढविणार, अशाप्रकारची भूमिका असू शकत नाही. स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. एकीकडे म्हणायचे पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही. एकीकडे म्हणायचे सुनेत्राताई पवार यांचे काय सामाजिक कार्य आहे की त्यांना बारामतीच्या लोकांनी मतदान केले पाहिजे ? असा देखील त्यांनी प्रश्न विचारला आहे. मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता का ? की डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते त्यांना मतदान करताना ? यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाचाळवीर विजय शिवतारेंसारख्या शिवराळ नेत्यांवर  कोणती कारवाई करणार ? असा सवाल परांजपे यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेShrikant Shindeश्रीकांत शिंदे