शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ च्या पुनर्बांधणीसाठी सह्यांची मोहीम 

By सदानंद नाईक | Published: February 10, 2023 6:20 PM

उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रं-२४ व लिलाशाह हिंदी माध्यम शाळा क्रं-१८ या दोन शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली ४ वर्षापूर्वी महापालिका बांधकाम विभागाने जमीनदोस्त केली.

उल्हासनगर : पुनर्बांधणीच्या नावाखाली महापालिका शाळा क्रं-१८ व २४ मधील हजारो मुलांना खाजगी संस्थेच्या वर्गात शिक्षणाचे धडे घेण्यासाठी पाठविले. मात्र गेल्या ४ वर्षांपासून शाळेच्या बांधकामाचा मुहूर्त न निघाल्याने, प्रवीण माळवे यांच्यासह अन्य साथीदारांनी शाळा पुनर्बांधणीसाठी शुक्रवारी सह्यांची मोहीम राबविली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रं-२४ व लिलाशाह हिंदी माध्यम शाळा क्रं-१८ या दोन शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली ४ वर्षापूर्वी महापालिका बांधकाम विभागाने जमीनदोस्त केली. तेव्हापासून महापालिका शाळेची इमारत उभी करू शकले नाही. दोन्ही शाळेतील हजारो विद्यार्थी एका खाजगी संस्थेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. 

शिक्षण विभागाच्या सावळागोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मात्र महापालिका बघायची भूमिका घेत असून राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. प्रवीण माळवे, कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर यांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या शहर दौऱ्यादरम्यान शाळेतील मुलांना ठाकूर यांची भेट घडवून न्याय मागण्याचा घाट राष्ट्रवादी पक्षाचे कमलेश निकम यांनी घातला होता. त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, गेल्या पावसाळ्यात कायद्याने वागा संघटनेचे अध्यक्ष राज असरोंडकर व वंचित बहुजन आघाडीचे प्रा प्रवीण माळवे यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या मुला समवेत भर पावसात हक्काच्या शाळेसाठी महापालिका प्रवेशद्वारा समोर निदर्शने केली. 

शाळा लवकर सुरु करा, या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर याना दिले होते. शाळा पुनर्बांधणी बांधकाम परवाना नगररचनाकार विभागात असून लवकरच शाळेच्या इनरतीचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने दिले होते. मात्र अध्यापही शाळा पुनर्बांधणीचे चिन्हे दिसत आहे. शाळेतील हजारो मुलांना न्याय देण्यासाठी अखेर शुक्रवारी प्रा प्रवीण माळवे यांनी सह्याची मोहीम राबवून महापालिकेचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. 

शिक्षण विभागाची अनास्थामहापालिका शिक्षण मंडळा अंतर्गत मराठी, हिंदी व गुजराती माध्यमाच्या २६ शाळा असून साडे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण मंडळासाठी वर्षाला ५० कोटीचे अंदाजपत्रक असतांनाही कोट्यवधीचा खर्च नेमका होतो कुठे? असा प्रश्न विचारला जात असून चौकशीची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर