शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

उल्हासनगरात सिंधी - मराठी वाद निकालात निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:35 IST

लोकसभा निवडणुकीनिमित्त शिवसेना व ओमी टीम एकत्र येण्याचे संकेत युतीचे संभाव्य उमेदवार खासदार श्रीकांत शिदे आणि ओमी कलानी यांनी दिल्याने, शहरातील मराठी व सिंधी वाद निकालात निघण्याची चिन्हे आहेत. र

- सदानंद नाईकउल्हासनगर : लोकसभा निवडणुकीनिमित्त शिवसेना व ओमी टीम एकत्र येण्याचे संकेत युतीचे संभाव्य उमेदवार खासदार श्रीकांत शिदे आणि ओमी कलानी यांनी दिल्याने, शहरातील मराठी व सिंधी वाद निकालात निघण्याची चिन्हे आहेत. रविवारी रात्री खासदार श्रीकांत शिंदे व ओमी कलानी यांची बैठक झाली. यावेळी शिवसेनेला साथ देण्यासाठी ओमी कलानी तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.उल्हासनगरात सिंधी व मराठी वाद निर्माण झाल्यानंतर, शिवसेना मराठी तर पप्पू कलानी हे सिंधी समाजाच्या मागे उभे ठाकले होते. शहरातील राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले ओमी कलानी कुटुंब व शिवसेना लोकसभा निवडणुकीनिमित्त एकत्र येणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाप्रमाणे शिवसेना बदल रही है, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील राजकारण गेल्या तीन दशकांपासून कलानी कुटुंबाभोवती फिरत आहे. कलानी कुटुंबातील सासूसुनेकडे आमदार व महापौर ही महत्त्वाची पदे असून ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या आमदार, तर पंचम कलानी भाजपाच्या महापौर आहेत. ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना करून भाजपासोबत महाआघाडी केली आणि पालिकेची सत्ता काबीज केली.लोकसभा निवडणुकीत ओमी टीमची मदत घेणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने सुरुवातीला घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल, तरच शिवसेनेला साथ देणार असल्याची भूमिका ओमी टीमने घेतली होती. दरम्यान, निवडणुकीच्या मुद्यावर श्रीकांत शिंदे यांच्याशी कलानी महलमध्ये रविवारी रात्री बैठक झाली.उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा विसरमहापालिका निवडणुकीत भाजपाने शिवसेनेऐवजी ओमी टीमसोबत आघाडी केली. त्यावेळी शहरात लावण्यात आलेल्या अनेक पोस्टर्सवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या रांगेत माजी आमदार पप्पू कलानी यांचे फोटो होते. या पोस्टर्सवरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना पप्पू कलानी यांच्या रांगेत आणून भाजपाची संस्कृती बदलल्याची टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर शहरातील पोस्टर्स गायब झाले होते. आता लोकसभा निवडणुकीत याच ओमी टीमसमोर शिवसेनेने मदतीचा हात पसरल्याने उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा शिवसेनेला विसर पडला की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांसह शिवसैनिकांनाही पडला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक