शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कंपनीची संरक्षक भिंत कोसळून सहा घरांचे नुकसान

By अजित मांडके | Updated: March 15, 2024 17:28 IST

कळवा येथील आनंद नगर भागात असलेल्या एकविरा संकुल चाळीवर मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली.

अजित मांडके, ठाणे : कळवा येथील आनंद नगर भागात असलेल्या एकविरा संकुल चाळीवर मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. ही भिंती येथील सहा घरांवर पडली असूून त्यामुळे येथील रहिवाशांच्या घरातील वस्तुंचे नुकसान झाले असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. 

सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवतीहानी झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली.शुक्रवारी दुपारच्या सुमारास एकविरा संकुल चाळ येथील सहा घरांवर मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत पडली. यावेळी घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व इतर पथक घटनास्थळी दाखल झाले. ही भिंत अंदाजे ८० फुट लांब व २० फुट उंच असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच यावेळी एक झाडही त्यामुळे पडल्याचे दिसून आले आहे. या घटनेत राघव जेना, मिनाक्षी कदम, वासुदेव साळवी, ललितकुमार खोत, संगिता पाटील आणि जयवंत माळी यांच्या घरावर ही भिंत पडली. यात घराच्या भिंती व छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. तर एक वृक्षही पडल्याने ते हटविण्याचे कामही यावेळी करण्यात आले.

टॅग्स :kalwaकळवाthaneठाणे