शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

भिवंडीत तरुणांच्या किरकोळ वादातून अ‍ॅसिड हल्ला; सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 1:07 AM

ऍसिड हल्ल्यातील जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर

भिवंडी: भिवंडी शहरातील साई नगर ताडाळी अंजुरफाटा रोड येथे गुरुवारी झालेल्या क्षुल्लक वादातून मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली होती , या भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांवर तीन ते चार जणांनी ऍसिड फेकून हल्ला केला. ज्यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. या ऍसिड हल्ल्यातील जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे .

शहरातील ताडाळी साईनगर येथील निखिल शर्मा हा गुरुवारी कामावरून घरी परतत असताना त्या परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीचा धक्का लागल्याने या कारणातून मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली  होती ,त्यानंतर निखिल शर्मा व त्याचे मित्र अभिषेक देशमुख ,अभिषेक शर्मा ,रोहित पांडे व सुरज पटेल हे मारहाण का केली , याचा जाब विचारण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी गेले असता त्यांच्यात बाचाबाची झाली व मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली त्या वेळी एका गटाकडून बेसावध असणाऱ्या या मुलांवर समोरच्या तीन ते चार व्यक्तींनी ऍसिड फेकले . या अचानक झालेल्या हल्ल्याने हे 5 ते 6  युवक भाजल्याने व्हीव्हळत तेथून पळत आपल्या घराकडे आले. या भांडणात एक महिला देखील जखमी झाली असल्याचे समजते . या ऍसिड हल्ल्यातील जखमींना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे तर अभिषेक देशमुख ,निखिल शर्मा व अभिषेक शर्मा यांना गंभीर जखम असल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे कळवा रुग्णालय या ठिकाणी रवाना केले असून स्थानिक नारपोली पोलिसांनी या जखमी युवकांचे जबाब नोंदवून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.