शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

 उल्हासनगर राणा डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्यावर संथ गतीने प्रक्रिया; ९ कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 6:03 PM

 उल्हासनगर महापालिकेचे म्हारळ गाव शेजारील राणा डॉम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाल्याने, डॉम्पिंग ग्राऊंड खालील नागरीवस्तीला धोका निर्माण झाला.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेच्या म्हारळ गाव शेजारील राणा डॉम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर गेल्या दीड वर्षांपासून प्रक्रिया करण्याचे सुरू आहे. मात्र प्रक्रियांचे काम संथगतीने होत असल्याने, २५ टक्केही काम झाले नसल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.

 उल्हासनगर महापालिकेचे म्हारळ गाव शेजारील राणा डॉम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाल्याने, डॉम्पिंग ग्राऊंड खालील नागरीवस्तीला धोका निर्माण झाला. डॉम्पिंगसाठी महापालिकेकडे पर्यायी जागा नसल्याने, नाईलाजास्तव कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथील मोकळ्या जागेवर कचरा टाकण्यास सुरवात केली. स्थानिक नागरिक व परिसरातील नगरसेवकांनी या डॉम्पिंगला विरोध करून उपोषण, धरणे आंदोलन, महासभेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, मुंडन आंदोलन करण्यात आले.

मात्र डॉम्पिंगसाठी पर्यायी जागा नसल्याने, शहरातील कचरा खडी खदान येथे टाकण्यात येत आहे. डॉम्पिंगचा भविष्यातील धोका ओळखून तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे, सुधाकर देशमुख यांनी राज्य शासनाला डॉम्पिंगच्या समस्यांची माहिती देऊन, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली. अखेर शासनाला जाग येऊन शहरा शेजारील उसाटने गाव हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा महापालिकेला हस्तांतर केली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, याठिकाणी एक ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.

 महापालिकेच्या जुन्या ओव्हरफ्लॉ झालेल्या राणा डॉम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्माण करण्याची योजना राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने, गेल्या दीड वर्षांपासून सुरू केली. मात्र गेल्या दीड वर्षात २५ टक्केही काम पूर्ण झाले नसल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. इतर योजने प्रमाणे या योजनेचा फज्जा उडणार असल्याचेही बोलले जाते.

महापालिका सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, मुख्य आरोग्य अधिकारी एकनाथ पवार यांनी राणा डॉम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रियाचे काम सुरू असून २५ टक्के पेक्षा जास्त काम झाल्याची प्रतिक्रिया दिली. उपमहापौर भगवान भालेराव हे राणा डॉम्पिंग ग्राउंड असलेल्या परिसरारून नगरसेवक पदी निवडून आले असून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गेल्या दीड वर्षात किती टक्के काम झाले. याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले. एकूणच डॉम्पिंगच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून याबाबत आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी. अश्या मागणीने जोर धरला आहे. 

९ कोटीच्या योजनेवर प्रश्नचिन्हे?

महापालिका हद्दीत राबविण्यात आलेल्या बहुतांश मोठया योजनेचा फज्जा उडाला असून राणा डॉम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामावरही प्रश्नचिन्हे उभे ठाकले. ४५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी गळती व पाणी टंचाईची समस्या जैसे थे आहेत. तसेच खेमानी नाला, भुयारी गटार योजना अश्या अन्य योजना कधी पूर्ण होणार? असा प्रश्नही विचारला जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे