शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

‘क्लस्टर’विनाच ठाणे होणार स्मार्ट

By admin | Published: September 25, 2016 4:30 AM

स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत ठाणे शहराची निवड झाल्यानंतर येत्या चार वर्षांत ठाणे स्मार्ट होईल, असे महापालिका सांगत असली तरी या योजनेतून शहरवासीयांची जिव्हाळ्याची क्लस्टर

ठाणे : स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत ठाणे शहराची निवड झाल्यानंतर येत्या चार वर्षांत ठाणे स्मार्ट होईल, असे महापालिका सांगत असली तरी या योजनेतून शहरवासीयांची जिव्हाळ्याची क्लस्टर योजना मार्गी लागेल अथवा नाही, याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे. क्लस्टरचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात असल्यामुळेच ठाणे शहर स्मार्ट सिटी जरी होणार असले, तरी शहरात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न कायम राहणार आहे. स्मार्ट सिटीसाठी तब्बल ६ हजार कोटींचा जम्बो आराखडा तयार केला असून त्यामध्ये क्लस्टर योजनेसाठी ४ हजार कोटींची तरतूद आहे. पहिल्या यादीमध्ये नाव येण्याचा आत्मविश्वास असल्याने यापूर्वीच विविध प्रकल्पांचा अभ्यास तसेच त्यांच्या कामाला सुरुवात झाल्याने येत्या चार वर्षांत शहर स्मार्ट होण्याचा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ठाण्याचे नाव मंगळवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली असली, तरी ठाण्याला स्मार्ट दिशेने घेऊन जाण्यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वीच प्रयत्न सुरू केले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत १ हजार कोटींची ठाण्यात विविध प्रकारची विकासकामे होणार असून यामध्ये ५०० कोटी केंद्र सरकार, तर ५०० कोटी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना उभे करावे लागणार आहेत. स्मार्ट सिटीच्या योजना राबवण्यासाठी तब्बल ६ हजार ६३० कोटींचा कृती आराखडा यापूर्वीच तयार केला होता. यामध्ये एरिया बेस डेव्हलपमेंट तसेच नियोजनबद्ध विकासाचा समावेश आहे. स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये नाव जाहीर होण्याच्या आधीच विविध प्रकल्पांचा सर्व्हे पूर्ण केला असून पेपर वर्कदेखील पूर्ण झाले आहे. यामध्ये नवीन एलिव्हेटेड ठाणे स्थानक, खाडीकिनारा विकास, ठाणे पूर्व सॅटीस प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाची परवानगीस्टेशन प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी मिळाली असून खाडीकिनारा विकासासाठी केंद्र शासनदेखील अनुकूल आहे. सर्व प्रकल्पांचा डीपीआर तयार झाला असून येत्या काळात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन चार वर्षांत ठाणे स्मार्ट शहर असेल, असा दावा पालिकेने केला आहे. असे असले तरी ठाण्यासाठी क्लस्टर योजनादेखील महत्त्वाची मानली जात आहे. शहरात आजघडीला ३ हजारांहून अधिक इमारती धोकादायकच्या यादीत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी पालिका विविध स्तरांवर योजना हाती घेत आहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटीच्या योजनेतदेखील तब्बल ४ हजार कोटी रुपये यासाठी प्रस्तावित केले आहेत. संपूर्ण खाजगी लोकसहभागातून (पीपीपी) क्लस्टर योजना राबवण्यात येणार असून विकासकांना जास्तीतजास्त एफएसआय देऊन ठाणेकरांसाठी अधिक घरे उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे. मात्र, क्लस्टरचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात असल्याने येत्या चार वर्षांत ही योजना मार्गी लागेल की नाही, याची शाश्वती नसल्याने क्लस्टरविनाच ठाणे स्मार्ट होईल, अशी शक्यता असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.