शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

...तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, साहित्यिक राजन गवस यांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 1:12 PM

आज चेहरे नसलेला शत्रू हजारो हातांनी सामान्य माणसाला गिळत आहे.

ठाणे : आपण महाराष्ट्र म्हणून आजारी आहोत, याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल, अशी चिंता कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी व्यक्त केली. 

आज चेहरे नसलेला शत्रू हजारो हातांनी सामान्य माणसाला गिळत आहे. तेव्हा जबाबदारी लिहिणाऱ्यावर येते. त्यामुळे या आजारी महाराष्ट्राचे किमान संवेदनशील महाराष्ट्रात रूपांतर करणे ही आजची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहामध्ये रविवारी हे संमेलन झाले. गवस म्हणाले की, गेली ४४ वर्षे मी लिहित आहे, परंतु कधी नव्हे तो महाराष्ट्र हा आजारी पडला आहे. हा आजारांचा प्रदेश आहे. 

सामान्यांच्या प्राथमिक गरजा भागविणारी कल्याणकारी राज्याची संकल्पना होती, परंतु या संकल्पनेपासून आपण खूप दूर जाऊन  नव्या भांडवली व्यवस्थेत आहोत. जिथे महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रेही मरणपंथावर आहेत. मल्टिस्पेशालिटीने गोरगरिबांचे शोषण केले आहे. शिक्षणाची मंदिरे न राहता तिथे दुकानदारी सुरू झाली आहे. तिसऱ्या बाजूला संपूर्ण शेतीत उद्ध्वस्तता आहे. नद्यांची गटारे झाली आहेत, महानगरांत येणाऱ्या सगळ्या महामार्गांमुळे असंख्य शेतकरी भूमिहीन होत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, यात गोरगरीब मरत आहेत. या गोरगरिबांचा श्वास आपल्या साहित्याच्या केंद्रापर्यंत कधीतरी यायला हवा. साहित्यिकाच्या मनात या संपूर्ण व्यवस्थेचे प्रश्न येणे गरजेचे आहे. सामान्यांचा विचार करणारा आणि भांडवलदारी व्यवस्थेचे समर्थन करणारा अशा दोन विभागांमध्ये समाज विभागला गेला आहे. याकडे पाहताना समाजाचा घटक म्हणून मी अस्वस्थ आहे, असेही गवस यांनी सांगितले.  

‘कोमसाप’चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, विलास जोशी, विलास ठुसे व आदी उपस्थित होते. सुरुवातीला ‘बहर’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

माणूस वजा केला तर साहित्यामध्ये काहीच उरत नाही. माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असतो. माणूस आणि त्याच्या भोवतालकडे पाहणे ही साहित्यिकाची अट असावी. पुणे, मुंबईत लिहिणारे लेखक आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये लिहिणाऱ्या साहित्यिकांची केंद्रे पाहिली तर साहित्याची केंद्रे ही सरकत चालली आहेत. - राजन गवस, संमेलनाध्यक्ष, ठाणे जिल्हा साहित्य संमेलन

टॅग्स :thaneठाणे