शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

‘रिव्हर व्ह्यू’ फ्लॅट २० लाखांत, पण...; बदलापूरमध्ये आक्रोश तीव्र होण्याचे एक सबळ कारण

By पंकज पाटील | Published: August 25, 2024 8:30 AM

पुराचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबीयांनी बदलापूर शहर सोडून देण्याचा निर्णय घेतला. 

पंकज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क|बदलापूर : ‘अवघ्या २० ते २५ लाखांत निसर्गरम्य बदलापुरात रिव्हर व्ह्यू फ्लॅट’ अशा आकर्षक जाहिराती करून बिल्डरांनी उल्हास नदीच्या तीरावर वसवलेले बदलापूरमधील कॉम्प्लेक्स तासभर मुसळधार वृष्टी झाली की, पुराच्या पाण्यात बुडून जातात. अगदी पहिला मजला पाण्याखाली जाण्याइतकी भीषण परिस्थिती येथील मध्यमवर्गीय नागरिकांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने पाहिली आहे. बदलापूरकर हे पुराने तर त्रस्त आहेतच पण नदीच्या पात्रालगतचे भूखंड विकले गेल्यावर व तेथे बांधकामे उभी राहिल्यावर पूर नियंत्रण रेषा निश्चित केल्याने काही भूखंडावरील बांधकामे थांबली आहेत. बदलापूरमध्ये आक्रोश तीव्र होण्याचे हे एक सबळ कारण आहे.

बदलापूर शहराचा विकास झाला तो उल्हास नदीच्या तीरावरच. मात्र गेल्या दहा वर्षांत शहराच्या बाह्य भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाल्यामुळे आता बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढली. रहिवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. २६ जुलै २००५ च्या महापुरात बदलापूर शहराची दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर या बदलापूर शहरात घर घेण्यास कोणीही तयार होत नव्हते. एवढेच नव्हे तर पुराचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबीयांनी बदलापूर शहर सोडून देण्याचा निर्णय घेतला. 

तीन ते चार वर्षे उलटल्यानंतर बिल्डरांनी पुन्हा उचल खाल्ली. बदलापूर शहराचा विकास सुरू झाला. उल्हास नदीच्या तीरावर पूर्वीपासून उभ्या राहिलेल्या इमारती आणि त्यामधील कुटुंबे आजही मुसळधार पाऊस पडू लागल्यावर दहशतीच्या वातावरणातच वावरत असतात. पावसाळा सुरू झाल्यावर अखंडित पाऊस पडू लागल्यावर पूर कधी दारात येईल याची शाश्वती बदलापूरकर देऊ शकत नाहीत.  प्रत्येक पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करायचा, घरातील फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान सहन करायचे अशी वेळ बदलापूरकरांना आली आहे.

ग्रामस्थांच्या नाराजीचे काय?पुराचा फटका कमी बसावा यासाठी पूर नियंत्रण रेषा आखण्यात येते. मात्र बदलापूरची पूर नियंत्रण रेषा ही शहराचा विकास पूर्ण झाल्यानंतर आखण्यात आली. त्यामुळे काही इमारतींची कामे रखडली. तेथे घरे खरेदी केलेल्यांची पंचाईत झाली.

पूर नियंत्रण रेषेमुळे विकास खुंटलाउल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा पाटबंधारे विभागाने निश्चित केली. मात्र ती नियंत्रण रेषा योग्य पद्धतीने आखण्यात आले नाही, असा दावा नागरिकांचा आहे. ज्या भागाला पुराचा धोका कधीच बसू शकत नाही तो भागदेखील पूर नियंत्रण रेषेच्या आत दाखवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

शासकीय मदत मिळेनाउल्हास नदीला पूर आल्यानंतर ज्या नागरिकांची घरे आणि दुकाने पाण्याखाली येतात त्यांचे पंचनामे करूनही बाधितांना मदत मिळत नाही.

इमारतींचा पुनर्विकास थांबला- नव्या पूर नियंत्रण रेषेमुळे उल्हास नदीच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास थांबला. - हा संपूर्ण परिसर पूर्ण नियंत्रण रेषेत दाखवण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धोकादायक इमारतीत राहण्याची वेळ आली. 

हेंद्रेपाडा हा भाग उल्हास नदीपासून जवळ असल्यामुळे जास्त पाऊस झाल्यास या भागातील अनेक घरे पाण्याखाली येतात. मात्र शासन स्तरावर त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.    - सिद्धेश हरवटे, बदलापूर 

पूर नियंत्रण रेषा निश्चित करताना जागेवर न येताच परस्पर गुगल मॅपवरच ही रेषा निश्चित करण्यात आली. त्यामुळे टेकडीवरचा भागदेखील पूर नियंत्रण रेषेत दाखवण्यात आला. या पूर नियंत्रण रेषेचे  नव्याने सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.    - मयूर मेहेर, बदलापूर

हेही एक कारणअनेकांचे संसार पाण्याखाली जातात तेव्हा प्रशासन दमडीही देत नाही. शासन, प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळण्याचे हेही एक सबळ कारण आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर