शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

एसटी संप : अवैध वाहतूकदारांकडून लूट; ५५० फेऱ्या रद्द, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:35 IST

एसटी कर्मचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे ठाणे जिल्ह्यात सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी अडलेल्या प्रवाशांची अक्षरश: लूट केली.

ठाणे : एसटी कर्मचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे ठाणे जिल्ह्यात सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी अडलेल्या प्रवाशांची अक्षरश: लूट केली. जिल्ह्यातील एसटीच्या आठ आगारांतून रोज एसटीच्या एक हजार सहा फेºया होतात. मात्र, या संपात सुमारे ४८ टक्के वाहक व चालकांनी सक्रिय सहभाग घेतल्याने संध्याकाळपर्यंत ५५० फेºया रद्द कराव्या लागल्याचे एसटीचे ठाणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी लोकमतला सांगितलेपुढील सहा दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे वेळीच घर गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांना संपाचा फटका बसला. त्यांच्या या गरजेचा गैरफायदा घेऊन अवैध वाहतूक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फोफावली. नेहमीपेक्षा जास्त भाडे आकारून या अवैध वाहतूकदारांनी प्रवाशांची चांगलीच लूट केली. यादरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही.सकाळी या संपास न जुमानता काही वाहक, चालकांनी बस नेहमीप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपात सहभागी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्यामुळे भिवंडीसह अन्य ठिकाणी आपापसात बाचाबाची झाली. तरीदेखील एक हजार १४४ बसफेºयांपैकी संपात सहभागी नसलेल्या काही वाहक, चालकांनी एकत्र येऊन सुमारे ५९४ बसफेºया पूर्ण केल्या. सुमारे ५२ टक्के वाहक, चालकांनी संपात सहभाग घेतला नाही. तर, ४८ टक्के कर्मचाºयांच्या सक्रिय सहभागामुळे एसटीचे दिवसभराच्या कालावधीत अंदाजे ३० लाखांचे नुकसान झाल्याचे ऐकायला मिळत आहे.जिल्ह्यातील कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, वाडा या बस आगारांत काही प्रवासी वाहतूक सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत सुरळीत होती. तर शहापूर, भिवंडी, ठाणे १, ठाणे २ आदी चार बस आगारांतील बस दिवसभरासाठी बंद होत्या. मात्र, काही कालावधीनंतर त्या आगारातही काही बसफेºया पूर्ववत करण्यात आल्या. जिल्हाभरातील आठ बस आगारांपैकी ठाणे १ येथे ११८ फेºया व ठाणे २ वरील १०४ प्रवासी फेºया रद्द कराव्या लागल्या.याशिवाय, भिवंडी आगारात सर्वाधिक १८२ बसफेºया रद्द केल्यामुळे केवळ ३४ फेºया दुपारनंतर पूर्ण केल्या. याखालोखाल शहापूरला ८९ फेºया, कल्याणला केवळ चार फेºया, विठ्ठलवाडीला ४३, मुरबाडला चार फेºया आणि वाडा येथील बस आगारातील सहा बसफेºया रद्द कराव्या लागल्या.शहापुरात आगर व्यवस्थापक पी.एम. शिंदे यांनी प्रवाशांची काळजी घेतली.भिवंडी आगारातील महाराष्ट्र कामगार संघटनेचा सदस्य जी.बी. इंगळे व व्ही.जी. आव्हाड यांच्यामध्ये बस आगाराबाहेर काढण्यावरून शिवीगाळ व बाचाबाची झाल्याने इंगळे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात जाऊन आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत नोंद घेऊन दोघांनाही समज दिली. या संपाचा फायदा घेऊन शहरातील काही रिक्षाचालकांनी ठाणे व कल्याण येथे जाण्यासाठी प्रवाशांची वाढीव भाडे मागून लूट केली. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ