शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात गेम पलटला! भाजप ४५, काँग्रेस ४२; जम्मूमध्ये स्थिती जैसे थे
2
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
3
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
4
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
5
अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
6
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
7
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
8
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
9
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
10
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
11
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
12
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
13
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
14
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
15
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
16
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
17
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
18
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
19
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
20
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

उल्हासनगरात ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण; महापालिकेचा पुढाकार

By सदानंद नाईक | Published: March 29, 2023 4:00 PM

उल्हासनगरात कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाल्यावर, नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुत्र्याच्या संख्येवर आळा घालण्याची मागणी महापालिकेकडे केली

उल्हासनगर : शहरातील कुत्र्याच्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिकेने १ मार्च पासून कुत्र्याचे निर्बीजीकरण सुरू केले. अवघ्या ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण केल्याची माहिती उपायुक्त दिपक जाधव यांनी दिली असून मांजरीचेही निर्बीजीकरण करण्याचे संकेत त्यांनी दिले.

उल्हासनगरात कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाल्यावर, नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुत्र्याच्या संख्येवर आळा घालण्याची मागणी महापालिकेकडे केली. शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात दररोज ४० पेक्षा जास्त कुत्रा चावल्याच्या नोंद होत आहे. यापूर्वी महापालिकेने कुत्र्याचे निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान गेली १० वर्षा पेक्षा जास्त काळ प्रक्रिया ठप्प पडल्याने, कुत्र्याच्या संख्येत वाढ झाली. एका वर्षात ३ हजार पेक्षा जास्त कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्याचे टार्गेट महापालिका आरोग्य विभागाने ठेवले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्वान निर्बीजीकरण केंद्राचे उदघाटन झाल्यानंतर, १ मार्च पासून प्रत्यक्षात श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू केली. दररोज २० ते २५ कुत्र्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जात असून ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण केल्याची माहिती महापालिका उपायुक्त डॉ दीपक जाधव यांनी दिली आहे.

 महापालिकेने अद्यावत श्वान निर्बीजीकरण केंद्र बांधले असून केंद्रात श्वानावर शस्त्रक्रिया केली जाते. निर्बीजीकरणासाठी कुत्र्याला ज्या परिसरातून आणले जाते. त्याच परिसरात शस्त्रक्रिया केल्यानंतर सोडले जाते. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर, कुत्र्याला डॉक्टर यांच्या निघराणी खाली उपचारासाठी ५ दिवस ठेवून त्यांना पूरक व योग्य आहार दिला जातो. त्यानंतर सोडून दिल्यावर, त्याची निघराणी विशेष पाठकाद्वारे ठेवली जाते. एका कुत्र्याच्या निर्बीजीकरणावर महापालिका ९५० रुपये खर्च केला जात असून निर्बीजीकरण शास्त्रकीया सुरूच ठेवण्याचे संकेत डॉ दीपक जाधव यांनी दिले. कुत्र्या सोबत पाळीव व भटक्या मांजरीचीही निर्बीजीकरण करण्याची माहिती उपायुक्त जाधव यांनी देऊन नागरिकांनी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र गेल्या एका महिन्यात एकाही मांजरीचे निर्बीजीकरण झाले नाही.

भटक्या मांजरी टार्गेटवर शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी श्वान व मांजरीचे निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली. ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण झाले असतांना, मांजरीच्या निर्बीजीकरणाने उदघाटनच झाले नाही. असे गंमतीने म्हटले जात असून भटक्या मांजरीवर महापालिकेच्या टार्गेटवर आले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर