शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

...तरीही शर्यत जिंकण्याची आस

By admin | Published: January 09, 2016 2:09 AM

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासह सार्वजनिक शौचालयांचा पुरता बट्ट्याबोळ झाला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत

अजित मांडके, ठाणेसांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासह सार्वजनिक शौचालयांचा पुरता बट्ट्याबोळ झाला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात स्वच्छतेच्या बाबतीत देशातील ७५ पैकी पहिल्या १० शहरांमध्ये क्रमांक पटकावण्याचा दावा केला आहे. याअंतर्गत केंद्राच्या एका त्रिसदस्यीय समितीने सलग तीन दिवस संपूर्ण शहराचा दौरा करून शहरातील शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाची माहिती घेऊन त्याचे आॅडिट केले आहे. त्यानुसार, पालिकेला स्वच्छतेबाबत ही रँक दिली जाणार आहे. त्यानुसार, प्रशासनाने हा दावा केला आहे.महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अभियानात शहरातील शौचालये, साफसफाई, कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाटीवर भर दिला आहे. त्यानुसार, महापालिकेची सध्याची स्थिती पाहता शहरात आजघडीला सुमारे ५४ हजारांच्या आसपास सार्वजनिक, वैयक्तिक आणि सामूहिक शौचालये आहेत. परंतु, यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच शौचालयांची अवस्था चांगली असून उर्वरितांची दैना झाली आहे. दरवाजे नसणे, कडी नसणे, विजेची सोय नाही, दुर्गंधी आणि साफसफाईचा उडालेला बोजवारा यातूनच त्यांच्या खऱ्या अवस्थेचा विचार होऊ शकतो.दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापनाचाही बोजवारा उडाला आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ६५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांत पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळविता आलेले नाही. कचरा संकलन, वाहतूक जरी योग्य रीतीने होत असली तरी त्याची विल्हेवाट लावणे हा महत्त्वाचा प्रश्न आजही सोडविता आलेला नाही. एकूणच शौचालये आणि शहरातील कचऱ्याची अवस्था पाहता या दोन्ही यंत्रणांत पालिका सपशेल फेल ठरली आहे.दरम्यान, पालिकेने आता स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून अत्यंत घाईने कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी विविध प्रयोग हाती घेतले आहेत. यामध्ये वूडवेस्ट, बायोवेस्ट, गांडुळ खत प्रकल्प, मेडिकल वेस्ट, कम्पोस्टिंगसह विविध प्रकारचे प्रकल्प हाती घेतले आहेत. तर, संपूर्ण शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी सामूहिक १५००, वैयक्तिक १२००० आणि सार्वजनिक ५०० शौचालये उभारली आहेत. बायोटॉयलेटही उभारली जाणार आहेत. सांडपाणी व्यवस्थापनही लंगडे असून अनेक भागांत मलनि:सारण वाहिन्या टाकलेल्या नाहीत. तसेच अनेक ठिकाणचे सांडपाणी प्रक्रिया न करताच ठाणे खाडीत सोडले जात असल्याने ती कमालीची प्रदूषित झाली आहे.