शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

विधिमंडळाचे काम बंद पाडू

By admin | Published: July 07, 2017 6:31 AM

जमीन परत मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नेवाळीतील शेतकऱ्यावर पोलिसांनी गोळीबार केला. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : जमीन परत मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नेवाळीतील शेतकऱ्यावर पोलिसांनी गोळीबार केला. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. हे आंदोलन न्याय्य हक्कासाठी होते. ते पोलिसांनी चिरडले. शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवले. जर नेवाळीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही; तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे काम बंद पाडू, असा इशारा शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी दिला. नेवाळीतील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायासंदर्भात पुढील दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील आगरी, कोळी आणि कुणबी समाजाची भव्य सभा सावित्रीबाई नाट्यमंदिरात गुरूवारी पार पडली. तिला प्रचंड गर्दी झाली होती. त्यात बोलतना आमदार भोईर यांनी हा इशारा दिला. या बैठकीला खासदार कपील पाटील, आमदार भोईर, गणपत गायकवाड, रुपेश म्हात्रे, विवेक पाटील, माजी आमदार रमेश पाटील, भाजप नेते जगन्नाथ पाटील, मनसेचे सरचिटणीस राजू पाटील, उपमहापौर मोरेश्वर भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, गंगाराम शेलार, अर्जुन चौधरी, काँग्रेस पक्षाचे संतोष केणे, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, आगरी सेनेचे राजाराम साळवी आदी विविध पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्यासह नेवाळीतील शेतजमीन परत करण्याची मागणी करणारे ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार भोईर भाषणासाठी उठताच, ‘आता भाषणबाजीचा कंटाळा आला आहे. पुढचे काय ते बोला,’ अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांतून व्यक्त झाली. त्यावर भोईर यांनी भाषण थांबवून सगळ््यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि या प्रश्नावर विधिमंडळाचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्याला आमदार रुपेश म्हात्रे यांनी दुजोरा दिला. सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या परीने नेवाळीच्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकारकडे दाद मागतील, असेही जाहीर करण्यात आले. भिवंडीतील दोन पोलिसांना जमावाने ठेचून मारले, तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर का केला नाही, असा सवाल आमदार म्हात्रे यांनी उपस्थित केला आणि पोलिसांचे बळ फक्त आगरी समाजावर चालते का, अशी संतप्त टीका केली.शेतकऱ्यांनी न्याय्य हक्कासाठी आंदोलन केले. पण त्यांना गुन्हेगाराची वागणूक दिली जाते. हा गुन्हा राजकीय स्वरुपाचा आहे. राज्यात अट्टल गुन्हेगार सुटतात, पण शेतकऱ्यांना जामीन मिळकत नाही. नेवाळीचे आंदोलन करणारा आंदोलक दलित किंवा मुस्लिम असता तर पोलिसांनी बळाचा वापर केला असता का, अशी टीका अनंत तरे यांनी केली. आगरी समाज गुन्हेगारीपासून दूर होत आहे. पुन्हा त्याला गुन्हेगारीत ढकलून कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका, असाही इशारा तरे यांनी दिला. पोलिसांनी नेवाळीतील आंदोलनकर्त्यांना अटक केली आणि त्यांच्या गुप्त भागावर पेट्रोल लावून मीठ चोळण्याचा प्रकार घडला आहे. त्यांच्यावर थर्ड डिग्रीचा वापर झाला आहे, अशी माहिती देत आमदार गणपत गायकवाड म्हणाले, हा प्रकार ऐकून मला खूप वाईट वाटले. मी जर त्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसेन, त्यांचे संरक्षण करु शकत नसेन तर अशा राजकारणात राहून काय उपयोग आहे. मी राजकारण सोडण्याचा विचार करतो आहे. आंदोलनकर्ते गुन्हेगार नाहीत. पण त्यांना गुन्हेगार ठरविले जात आहे. आजची सभा घेणाऱ्यांवरही पोलिसांनी दबाव टाकला होता. नेवाळीच्या आंदोलनकर्त्यांवर पोलीस कोठडीत जे अत्याचार सुरु आहे. त्या विरोधात शुक्रवारी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही गायकवाड यांनी दिला. ‘पोलिसांनी तोडपाणी केले’एकच आरोपी तीन ठिकाणी दाखवून त्याला गुन्हेगार केले जात आहे. ३०७ कलमाचा वापर करुन त्यांनी खुनी ठरविले जात आहे. पोलिसांनी दोन आरोपींना सोडविण्यासाठी ५० हजार रुपयांचे तोडपाणी केले. पोलिसांना शेतकऱ्यांनी जशास तसे उत्तर दिल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला आणि त्यांनी आकसापोटी शेतकऱ्यांची धरपकड सुरु केली. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. त्याच पोलिसांनी ५० हजार रुपयांची तोडपाणी केली, तेव्हा त्यांचा स्वाभिमान कुठे गेला होता? असे प्रश्नही गायकवाड यांनी विचारले.