शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

ठाणे पालिकेचा अजब कारभार; इमारत कोरोना विलगीकरणासाठी केली आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 06:54 IST

गृहकर्जाचे हप्ते, राहत्या घराचे भाडे असा दुहेरी भुर्दंड आवाक्याबाहेर गेल्याची प्रतिक्रिया शीळफाटा येथील भारत इकोव्हीस्टा इमारतीत घर घेतलेल्या राधिका देसले यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन वर्षे विलंबाने घराचा ताबा मिळणार होता. मात्र, इमारतीचा वापर परवाना (ओसी) मंजूर करण्याऐवजी कोरोना विलगीकरणासाठी ती ठाणे पालिकेने आरक्षित केली. लोकांच्या विरोधामुळे हे सेंटर सुरू झाले नाही. मात्र, पालिका इमारतीचे उर्वरित कामही करू देत नाही; आणि ओसीही देत नाही. त्यामुळे हक्काच्या घराचा ताबा मिळविण्यात विघ्न निर्माण झाल्याचे घर मालकांचे म्हणणे आहे.

गृहकर्जाचे हप्ते, राहत्या घराचे भाडे असा दुहेरी भुर्दंड आवाक्याबाहेर गेल्याची प्रतिक्रिया शीळफाटा येथील भारत इकोव्हीस्टा इमारतीत घर घेतलेल्या राधिका देसले यांनी दिली. तीनपैकी दोन इमारतींचे काम पूर्ण झाले. तेथील घरांचा ताबा मालकांना दिला. तिसरी इमारत २०१७ साली पूर्ण होणार होती. फेब्रुवारी, २०२० मध्ये विकासकाने इमारतीच्या ओसीसाठी पालिकेत अर्ज केला. कोरोनाचे कारण देत ती मंजूर झाली नाही. दरम्यान, २९ मे रोजी ठाणे पालिकेने नोटीस धाडून इमारत आयसोलेशन सेंटरसाठी आरक्षित करीत असल्याचे सांगितले. सेंटरमुळे अन्य इमारतीतल्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती होती. त्यामुळे स्थानिकांनी विरोध केला.दोन महिने होऊनही येथे रुग्ण आयसोलेशनसाठी आले नाहीत. पाठपुराव्यानंतरही ओसी मिळत नसल्याने सुमारे १०० कुटुंबांना हक्काच्या घराचा ताबा मिळेनासा झाला आहे. पालिका अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता नोटीस रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नसल्याचे उत्तर देण्यात आले.सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोपविलगीकरण केंद्राची नोटीस रद्द करावी, या मागणीसाठी रहिवाशांनी पालिकेचे साहाय्यक आयुक्त, उपायुक्त, आयुक्त, मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या. मात्र, कुठूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरू असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस