शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

वरसावे पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण

By admin | Published: September 23, 2016 3:13 AM

दुरुस्तीमुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८ वरील वरसावे पुलाचे गुरुवारी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी अंतिम स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण केले

राजू काळे , भार्इंदरदुरुस्तीमुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८ वरील वरसावे पुलाचे गुरुवारी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी अंतिम स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण केले. त्यामुळे लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रभारी व्यवस्थापक दिनेश अग्रवाल यांनी दिली. एनएचएआयने येथील उल्हास नदीवर १९७३ मध्ये बांधलेल्या पुलामुळे गुजरातला जाणारा पर्याय उपलब्ध झाला. परंतु, या पुलाला अवघ्या १९ वर्षांतच दुरुस्तीचे ग्रहण लागले. ३४ वर्षांत यंदाची तिसरी मोठी दुरुस्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये गर्डरला तडा गेल्याने दीड वर्ष हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. जुलै २०१५ मध्ये वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर हा पूल पुन्हा महाडच्या सावित्रीमुळे दुरुस्तीच्या चर्चेत आला. ६ आॅगस्टला सर्वप्रथम ‘लोकमत’च्या वृत्तानंतर एनएचएआयने ३ सप्टेंबरपासून पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटला सुरुवात केली. २० दिवसांपासून सुरू असलेल्या आॅडिटला गुरुवारी अंतिम स्वरूप देण्यात आले. यावेळी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या पथकाने आवश्यक यंत्रणांसह दुपारपर्यंत संपूर्ण पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. त्यासाठी पुलावर एक मार्ग बंद ठेवला होता. दुसऱ्या लेनमधून वाहतूक सुरू झाल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण पडल्याने कोंडी झाली. अचानक खोळंबलेल्या वाहतुकीमुळे सर्व वाहनांना वरसावे वाहतूक जंक्शनमार्गे पुलावरून तसेच ठाण्याला जाण्यासाठी सुमारे १ ते २ तास कोंडीत अडकून राहावे लागले. अंतिम स्ट्रक्चरल आॅडिट संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अंतिम तपासणीनंतर या पुलाचा कोणता भाग दुरुस्तीयोग्य आहे, त्याचे काम पथकातील तज्ज्ञांनी सुरू केले आहे. ते दोन दिवसांत पूर्ण होऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याबाबत, अधिक माहिती देताना अग्रवाल म्हणाले, पुलाच्या कोणत्या भागाचे किती नुकसान झाले आहे, त्याची टक्केवारी निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते प्राधान्याने पूर्ण केले जात आहे. पथकाच्या निर्णयानंतरच पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात हाती घेणार असून त्यावेळी मात्र पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार असल्याचे ते म्हणाले.