शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

विद्यार्थी १६३ आणि शिक्षक केवळ एकच

By admin | Published: April 10, 2017 5:33 AM

भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोरपाडा या प्राथमिक शाळेत १६३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच

 रोहिदास पाटील / अनगावभिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोरपाडा या प्राथमिक शाळेत १६३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, याकरिता शिक्षण विभागाकडे लेखी तक्र ारी करूनही नेमणूक न केल्याने शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.ठाणे जिल्हा परिषद व भिवंडी पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या बोरपाडा या शाळेत १६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये जव्हार, मोखाडा या तालुक्यांतून वीटभट्टीवर स्थलांतरित झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या ७७ आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाच शिक्षकांची गरज असतानाही येथे एकही शिक्षक दिलेला नाही. तीन वर्षांपासून एक शिक्षक आहे. तेच शाळेचे मुख्याध्यापक म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांना केंद्रातील व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या बैठका व पत्रव्यवहार करण्याचीही जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या काळात वर्गाची जबाबदारी मुलावर देत किंवा शाळा सोडली जात असल्याची माहिती पालक व ग्रामस्थांनी दिली. ज्या शाळा कल्याण व ठाणे शहराजवळ आहेत, त्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असतानाही जास्त शिक्षक आहेत. तेथे शिक्षकांच्या सोयीनुसार पंचायत समिती शिक्षण विभागाने त्यांच्या नियमांना बगल देऊन नियुक्त्या केल्या आहेत. त्या कोणत्या आधारे करण्यात आल्या, हे निदर्शनास आणूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती पालकांनी दिली. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आदिवासी, कातकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने या शाळेला शिक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच घनश्याम भोईर यांनी केली आहे. या शाळेस तात्पुरता एक शिक्षक दिला आहे. मात्र, सरकारी परिपत्रकानुसार त्याचे वेतन काल्हेर शाळेत निघते. त्याला लेखी पत्रही दिलेले नाही.तीन वर्षांपासून शाळेत एकच शिक्षक आहे, हे खरे आहे. शिक्षकांच्या नेमणुका व्हाव्यात, याकरिता पत्रव्यवहार केला आहे.- बाबू धापशी, मुख्याध्यापक व शिक्षकबोरपाडा जि.प. शाळेत शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात, यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरिता प्रयत्न सुरू आहे.- कैलास सोनावणे, केंद्रप्रमुख